ठाकरेंना आणखी एक धक्का; ३५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नवा पक्ष ठरला

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष(politics) सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज ठाकरे गटाचे संभाजीनगर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह तब्बल ३५ स्थानिक नेत्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले.

यामध्ये माजी नगरसेवक आणि शिवसेना(politics) आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राजीनामा सादर केला आहे. हे सर्व पदाधिकारी मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक स्थानिक नेते शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाड्यात पक्षात मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीनगचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केला. नुकताच पक्षाचे मराठवाडा विभाग सचिव अशोक पटवर्धन यांनीही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला.

संभाजीनगरमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील गटाबाजीविरोधात पक्षप्रमुखांकडे पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर यापुढे कोणीही शिवसेना सोडणार नाही असा दावा केला होता मात्र आज ३५ पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे हा दावा फोल ठरला. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी नेते पदाधिकाऱ्यांनी पक्षाला केलेला जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाठी चिंता वाढवणारा आहे.

शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार(politics) यांनी काल(दि. 20 जानेवारी) रोजी राजीनामा दिला. त्यांनी पक्षाकडून लोहा-कंधार मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. १० ते १५ आमदार शिवसेनेत प्रवेश करतील असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

करवीर वासियांना संधी केव्हा, तुमचे आभार मानण्याची….?

हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाचा मोठा निर्णय!

अरे थांब… सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?