आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!

एप्रिलचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. एप्रिल महिन्यामध्ये उन्ह जास्त असल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.(skin care)
या महिन्यात चेहऱ्यावर जास्त प्रमाणात टॅन होण्याची समस्या निर्माण होते. मग अशावेळी जास्त करून मेकअप वापरू नका. यामुळे त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते.(skin care)
याशिवाय नारळ पाणी, लिंबू पाणी, फळांचा रस प्या. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवेल. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच ते तुमची त्वचा देखील हायड्रेट ठेवेल. यातूनच त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.
नियमितपणे क्लिन्झर, एक्सफोलिएटर्स, टोनर आणि मॉइश्चरायझर्स वापरा. सध्या उन्हाळ्याची वेळ असल्याने त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
तुम्ही जे खात आहात त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि त्वचेवर होतो. अधिक फायबरयुक्त पदार्थ खा. त्यामुळे आतडे व्यवस्थित राहतील, जे त्वचेसाठीही फायदेशीर ठरेल. फळे, खजूर, हिरव्या पालेभाज्या यांसारखे पदार्थ तुमच्या त्वचेचे पोषण करतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा नक्की सल्ला घ्या)
हेही वाचा :