एकीकरण समितीचं आज धरणं आंदोलन, कोल्हापुरात कार्यकर्ते आक्रमक
कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आज, सोमवारी, ‘चलो कोल्हापूर’चा नारा दिला होता. (kolhapur news) या मोहिमेस बेळगावातील छ्त्रपती शिवाजी महाराज उद्यानातून सुरुवात झाली आहे. मालोजी अष्टेकर, नगरसेवक रवी साळुंके, नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी यांच्या उपस्थितीत मोहिमेला झाली सुरुवात.
खानापूर आणि बेळगाव ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मराठी भाषिक कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. (kolhapur news) कोगनोळी नाक्यापासून एकत्रित रित्या रॅलीसह कोल्हापूरकडे रवाना होऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं जाणार आहे.
सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजिण्यात येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या महामेळाव्याला यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून रोख लावला. यावेळी झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘चलो कोल्हापूर’चा नारा दिला होता.
आपल्या मागण्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाचा विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्याची विनंती करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार कशापद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार करत आहे, कर्नाटक सरकार लोकशाहीची कशापद्धतीने पायमल्ली करून दडपशाहीचे अस्त्र उगारत आहे, याची इत्यंभूत माहिती दिल्लीदरबारी पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा :