ठाकरे गटाचा बडा मासा शिंदेच्या गळाला ; प्रवेशाची तारीखही सांगितली

विधानसभा(Assembly) निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर महाविकास आघाडीत धुसपूस असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवा घरघर लागल्याचं चित्र आहे.

विधानसभा (Assembly)निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांची तक्रार करूनही पक्षप्रमुखांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने माजी आमदार राजन साळवी नाराज आहेत. दुसरीकडे, भास्कर जाधव यांनीही घरचा आहेर दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे गटाला कोकणात खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी कोकणातील राजकीय घडामोडीवर भाष्य केलं. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दाओसला जाणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जानेवारी रोजी मी दाओसला जाणार असून २४ जानेवारीला परत येणार आहे. येत्या २४ तारखेपर्यंत आपण वाट बघावी.

महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असलेला पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फार मोठा पक्षप्रवेश येत्या आठ दिवसांत होणार आहे. असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

संगमेश्वर आणि रत्नागिरीमधील प्रवेश असतील का, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले, मी पंधरा दिवसांपूर्वीही असं सांगितलं होतं की, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो, ते काँग्रेसबरोबर गेल्यामुळे आमची सत्य परिस्थिती तशी आहे.

त्याबाबतची जाणीव झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील लोक आमच्याकडे येत आहेत. रत्नागिरीबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेची ज्या पद्धतीने काँग्रेस झाली आहे, तीच परिस्थिती ठाकरे गटाची या जिल्ह्यात झालेली दिसणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षातील काही लोकांनी आपल्या विरोधात काम केल्याचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचे म्हणणे आहे. त्यासंबंधीचा अहवालही साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे.

मात्र, पक्षाच्या विरेाधात काम करणाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही, त्यामुळे राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पक्ष सोडण्याबाबत यापूर्वीही बातम्या आलेल्या आहेत.

दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेची काँग्रेस झाली आहे, असा घरचा आहेर पक्षाला दिला होता. तसेच ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही, अशी हतबलताही जाधव यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे तेही पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे.

कोकणातील काही नेते नाराज असले तरी उद्योग मंत्री सामंत यांनी कोणाचेही नाव घेतलेली नाही. त्यामुळे शिंदे सेनेच्या गळाला लागलेला कोकणातील बडा मासा कोण, असा सवाल आता चर्चिला जात आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना वसुलीची भीती; लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज…

VIDEO फैसल नावाच्या तरुणाला बजरंग दलाकडून मारहाण

मी आहे माफिया… शाहिद कपूरची पोलिसाच्या दमदार भूमिकेत एंट्री, ‘देवा’चा ट्रेलर धमाकेदार