कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका वाढला….

कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे (rain)परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी धोका पातळीच्या फक्त पाच इंचावर पोहोचली आहे, त्यामुळे शासकीय यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. कोल्हापूर शहरात महापालिकेने वॉररूम सुरू केली आहे.

जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे आणि आजही मुसळधार पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. शहरातील पावसाची उघडीप दुपारी तीन वाजेपर्यंत होती, पण त्यानंतर मुसळधार पावसाने जोर धरला. करवीर आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागांत पुराचे पाणी घुसत असल्यामुळे नागरिकांना तात्काळ स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे, आणि अनेक ठिकाणी घर पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

या परिस्थितीत नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी मदत करण्याची तयारी केली आहे.

हेही वाचा :

दिव्यांगांना दरमहा 1 ते 3 हजारांपर्यंतचे अर्थसहाय्य: ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित: “सरकारची खुर्ची धोक्यात येईल” असे त्यांनी चेतावले

सरकारचा धक्कादायक निर्णय: 600 शाळांवर टाळे, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ