शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका

राज्यात विधानसभा निवडणुका(current political issues) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण पसरले आहे.

भाजपचे(current political issues) आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी हा कॅन्सर झाला आहे. तसेच राज्यात छत्रपती शिवाजी महाजांनी दिलेली तेजाची झळाली ही देखील शरद पवारांमुळे हरवली आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सवाल देखील उपस्थित केला आहे. शरद पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार म्हणतात ना सत्ता आमच्या हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. तर तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे तब्बल 50-60 वर्षे आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी देखील शरद पवारांमुळंच हरवली आहे. याशिवाय शरद पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा सध्या मिळाला आहे. तो बदलवून शरद पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा:

श्री गणेश विसर्जन मिरवणूक कालची आणि आजची……!

…आणि ऐश्वर्या- आराध्यानं कॅमेरासमोरच एकमेकिंना किस केलं

भाजप नेत्यानं धमकी दिली ‘वर्दी उतरवा देंगे…’, जिगरबाज ASI नं स्वत:च वर्दी काढली अन्…