सत्तेची चावी महायुती की महाविकास(Mahavikas) आघाडीकडे जाणार याचा निर्णय 158 मतदारसंघ करणार आहे. या 158 मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. त्यामुळे 158 मतदारसंघाचा कौल भाजप सरस की काँग्रेस, खरी शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची, ओरिजनल राष्ट्रवादी दादांची की साहेब याचा फैसला होणार आहे. या थेट लढतींमुळे फक्त राज्यातील सत्तेत कोण बसेल याचा निर्णयच होणार नाही, तर राज्यात भाजप सरस आहे की महाराष्ट्र काँग्रेसचे गड आहे, खरी शिवसेना शिंदेंची आहे की ठाकरेंची आणि ओरिजनल राष्ट्रवादी दादांची असणार की राष्ट्रवादी शरद पवारांची याचा निर्णयही होणार आहे. त्यामुळे या थेट लढती निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत आणि मतदारांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
2019 पर्यंत महायुती आणि महाआघाडी मध्ये दोन दोन पक्ष होते. त्यामुळे प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेस शिवसेना विरोधात निवडणूक लढवत होती. मात्र, 2019 नंतरच्या बदललेल्या समीकरणात राज्यातील महायुती आणि महाविकास (Mahavikas)आघाडी या दोन्ही प्रमुख अलायन्समध्ये तीन-तीन पक्ष झाले. दोन्ही बाजूचे दोन दोन पक्ष तर एक प्रमुख पक्ष फुटून तयार झालेले दोन गट असे आहेत. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे अशी थेट लढतीचे समीकरण निर्माण झाले आहे.
राज्यातील तब्बल 75 मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत
भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत विदर्भातील 35, मराठवाड्यातील 10, पश्चिम महाराष्ट्रातील 12, मुंबईतील 8, उत्तर महाराष्ट्रातील 6 आणि कोकणातील 4 अशा मतदारसंघात आहे.दुसरी थेट लढत दोन्ही शिवसेना मध्ये होत आहे. शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या सेनेसमोर तब्बल 46 मतदारसंघात उभी ठाकली आहे.
विदर्भात 5 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. मराठवाड्यात 10, पश्चिम महाराष्ट्रात 8, मुंबईत 10, उत्तर महाराष्ट्रात 4 आणि कोकणात 9 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत.
राज्यातील 37 मतदारसंघात काका आणि पुतण्यांच्या राष्ट्रवादीत आपापसात संघर्ष होत आहे..दोन्ही राष्ट्रवादी विदर्भात 3 मतदारसंघात, मराठवाड्यात 6 ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 21 ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे संघर्ष होणार आहे.
मुंबईत 1, उत्तर महाराष्ट्रात 3 आणि कोकणात ही 3 ठिकाणी काका पुतण्यांचे पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत.
दरम्यान, 38 मतदारसंघ असे आहे, जिथे भाजप उमेदवारांसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांचा कौलही मत्त्वाचा ठरेल. शिवाय 34 मतदारसंघात भाजपचे उमेदवार कधीकाळी मित्र पक्ष राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी दोन हात करणार आहे.19 मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिक काँग्रेस समोर उभे आहेत. त्यामुळे हे मतदारसंघही राज्याच्या सत्तेचा निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सर्वाधिक थेट लढती विदर्भात आहे. दोन्ही शिवसेनेमधील सर्वाधिक थेट लढती मुंबई आणि कोकणात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वाधिक थेट लढती स्वाभाविकपणे पवारांचा प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत.
हेही वाचा :
मतदानाआधीच अनपेक्षित आकडे समोर; सत्तेत मविआ की महायुती?
‘पुढील 10 ते 15 दिवसांत माफी मागा अन्यथा…’, पाकिस्तानी डॉनकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी
पुस्तकाच्या पानांची फडफड काही राजकारण्यांची चरफड