अभिनेता-राजकारणी विजय थलापती विरोधात फतवा जारी

तामिळ सुपरस्टार(actor) आणि तमिलगा वेत्री कळघम प्रमुख थलपथी विजय पुन्हा एकदा वादात सापडला आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका सुन्नी मुस्लिम संघटनेने त्यांच्याविरुद्ध फतवा जारी केला आहे. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि चश्मे दारूल इफ्ताचे प्रमुख मुफ्ती मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी विजय यांच्यावर मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप केला आहे. या बातमीने आता खळबळ उडाली आहे अभिनेत्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी फतव्यात म्हटले आहे की, विजय(actor) यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे आणि अलिकडच्या इफ्तार कार्यक्रमाद्वारे मुस्लिम समुदायाचा अपमान केला आहे. त्यांनी विजयच्या २०२२ मध्ये आलेल्या ‘बीस्ट’ चित्रपटाचा उल्लेख केला, ज्यामध्ये मुस्लिम समुदायाला दहशतवाद आणि अतिरेकीपणाशी जोडल्याचा आरोप होता. मौलाना म्हणाले, “विजयने त्याच्या चित्रपटांमध्ये मुस्लिमांना ‘राक्षस’ आणि ‘सैतान’ म्हणून दाखवले होते. आता राजकारणात येण्यासाठी तो मुस्लिम समुदायाबद्दल प्रेम दाखवत आहे, जे फक्त मते मिळविण्यासाठी एक रणनीती आहे.”

याशिवाय, मौलानांनी ८ मार्च रोजी चेन्नईतील वायएमसीए ग्राउंडवर विजयने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवर टीका केली. त्यांनी आरोप केला की या कार्यक्रमात ‘दारू आणि जुगारी’ उपस्थित होते जे उपवास पाळत नव्हते किंवा इस्लामिक नियमांचे पालन करत नव्हते. मौलानांनी याला रमजानच्या पावित्र्याचे उल्लंघन म्हटले आणि तामिळनाडूतील मुस्लिम समुदायाला विजयपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

विजयच्या इफ्तार पार्टीबद्दल आधीच तक्रारी आल्या आहेत. ११ मार्च रोजी, तामिळनाडू सुन्नत जमातने विजयविरुद्ध चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली. संघटनेचे कोषाध्यक्ष सय्यद कौस म्हणाले होते की, “विजयच्या इफ्तार कार्यक्रमात असे लोक उपस्थित होते ज्यांचा उपवास किंवा इफ्तारशी काहीही संबंध नव्हता. हा मुस्लिम समुदायाचा अपमान आहे.” कार्यक्रमात गोंधळ उडाला आणि परदेशी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांना प्राण्यांसारखे वागवले, असा आरोपही त्यांनी केला होता. सय्यद यांनी स्पष्ट केले होते की ही तक्रार प्रसिद्धीसाठी नाही तर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी करण्यात आली आहे.

८ मार्च रोजी विजयने त्यांच्या राजकीय पक्ष टीव्हीकेच्या बॅनरखाली चेन्नईमध्ये एका भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तो पांढऱ्या पारंपारिक पोशाखात आणि टोपीमध्ये दिसला. या कार्यक्रमाला सुमारे ३,००० लोक उपस्थित होते आणि १५ स्थानिक मशिदींमधील इमामांनाही आमंत्रित करण्यात आले होते. विजयच्या चाहत्यांनी या निर्णयाचे वर्णन सर्वसमावेशकता आणि बंधुत्वाचे प्रतीक म्हणून केले, परंतु काहींनी याला राजकीय रणनीतीचा भाग म्हणून उचललेले पाऊल म्हटले.

हेही वाचा :

कोल्हापूर : कसबा बावड्यात ‘नटीची मिठी राहिली बाजूला’ अन्… 

अजितदादांची तुफानी खेळी, ४ बडे नेते राष्ट्रवादीत जाणार?

मूल होत नाही म्हणून तहसीलदाराचा अभद्र प्रकार केलं असं काही की तुम्हाला येईल प्रचंड संताप