मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर

आगामी विधासभा निवडणूक (political)अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जागा वाटपाचा मुद्दा चांगलंच चर्चेत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर एक मोठं भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला आहे. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.

राज्यातील विधानसभेत(political) महायुतीच सरकार आणणं हे आमचं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यामुळे महायुतीची सगळे घटक पक्ष एकत्रितपणे प्रयत्नशील आहोत. याशिवाय महायुतीच जागावाटपाच देखील बरंच काम पूर्ण झालेलं आहे.

याशिवाय राज्यातील जागावाटपावरून काही ठिकाणी मार्ग मात्र अद्याप निघाला नाही. परंतु आम्ही यावर लवकरच बसून मार्ग काढू. त्यामुळे जागावाटप झालं की आम्ही जाहीर करूअसं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत तब्बल 80 ते 90 जागा लढण्यावर दावा केला असल्याची चर्चा देखील रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना केली. तसेच अजितदादांनी गणपतीची पूजा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

राज्यातील सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांना मुख्यनमंत्रिपद मिळावं असं वाटतं असत. मात्र त्या सगळ्यांमध्ये मी देखील आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा हा गाठावा लागतो. त्यामुळे सर्वांचीच इच्छा पूर्ण होत नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा:

अंध दांपत्याच्या नवजात बाळाला डॉक्टरांकडून विकण्याचा प्रयत्न

घड्याळ काढणार, तुतारी धरणार; अजितदादांना होमपिचवरच धक्का

सलमान खान येणार आहे भविष्य पाहण्यासाठी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये, प्रोमो प्रदर्शित