ब्रेकअपचा बदला! राजेश खन्नांनी EX च्या घरासमोर काढली वरात, १७ वर्षांचा अबोला अन् मग काय घडलं?

बॉलिवूड सुपरस्टार(actor) राजेश खन्ना त्यांच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत असत. पण अखेर त्यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशीच लग्न केले. डिंपल आणि राजेश यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली होत्या. डिंपल यांच्यापूर्वी राजेश यांचे अभिनेत्री अंजू महेंद्रूसोबत अफेअर होते. त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. आज राजेश खन्ना यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊ.

अंजू महेंद्रू एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. अंजू जेव्हा इंडस्ट्रीत आपले नाव कमावण्यासाठी धडपडत होत्या, तेव्हा राजेश खन्ना (actor)सुपरस्टार होते. दोघांची भेट कशी झाली याबद्दल फारशी माहिती नाही, पण त्यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत होती.

त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली. दोघे तब्बल ७ वर्षे (१९६६ ते १९७२) रिलेशनशिपमध्ये होते. राजेश आणि अंजूचे लग्न व्हावे, अशी अंजू यांच्या आईची इच्छा होती. राजेश यांनाही त्यांच्याशी लग्न करायचे होते पण अंजूच्या सततच्या नकारामुळे १९७२ मध्ये त्या दोघांचे ब्रेकअप झाले.

१९७१ मध्ये अंजू वेस्ट इंडिजचा क्रिकेटर गॅरी सोबर्सला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. त्यानंतर परिस्थितीत सगळंच बदललं होतं. यामुळे राजेश खन्ना प्रचंड संतापले होते. यानंतर त्यांच्या नात्यात बराच बिघाड झाला.
अंजूने राजेश खन्ना यांच्याबद्दल काय म्हटले…

राजेशबद्दल सांगताना अंजू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘राजेश एक परंपरावादी व्यक्ती आहेत. पण कसे तरी ते अल्ट्रा मॉडर्न मुलींकडे आकर्षित व्हायचे. गोंधळ आमच्या नात्याचा भाग होता. मी स्कर्ट घातला तर ते रागावून म्हणायचे की तू साडी का घालत नाहीस? मी साडी नेसली असती तर ते म्हणाले असते की तू भारतीय स्त्रीचा लूक का दाखवत आहेस?

राजेश म्हणाला होते, ‘स्टुडिओत काम केल्यानंतर मी अनेकदा घरी परतायचो तेव्हा मला एक चिठ्ठी मिळायची. त्यात लिहिलेलं असायचं की ती या या पार्टीला गेली आहे. किंवा मी थकून एकटा तिच्या घरी जायचो तेव्हा मी तिला दरवेळी तिच्या मित्रमैत्रीणींसोबतच पाहायचो …मला तिच्यासोबत एकांतात वेळ घालवायचा होता…’ राजेश खन्ना पुढे म्हणाले की, जेव्हा मी तिला माझ्या आईसोबत वेळ घालवायला सांगितला तेव्हा तिने साधे प्रयत्नही केले नाहीत.

अंजू यांनी आपले करिअर सोडावे, अशी राजेश खन्ना यांची इच्छा असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. अंजू म्हणाल्या होत्या की, जेव्हा मी माझ्या करिअरच्या शिखरावर होते, तेव्हा राजेशची इच्छा होती की मी मॉडेलिंग सोडावे. मी अभिनय सोडावा….

अंजूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये डिंपल कपाडियाशी लग्न केले. राजश यांनी मुद्दाम अंजू यांच्या घराबाहेरून त्यांच्या लग्नाची वरात काढल्याचेही बोलले जात आहे. ब्रेकअपनंतर राजेश आणि अंजू १७ वर्षे बोलले नाहीत. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या क्षणात अंजू त्यांच्यासोबतच होत्या.

हेही वाचा :

“खराब शॉटमुळे गावसकरांचे पंतवर ताशेरे, Video व्हायरल!”

धक्कादायक! उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू

“सरपंच हत्या प्रकरण: संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर तीव्र हल्लाबोल!”