लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशी यांचा सिनेमा…

अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांचा नवा सिनेमा (new movies) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बंधू’ सिनेमाचं शुटिंग सध्या सुरु झालंय. ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे. ‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ च्या यशानंतर लेखक – दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. ‘

अॅनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ‘ बंधू ‘ या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच असं त्याला टॅगलाईन देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे हे आपल्याला समजते. लवकरच भावांमधील ही अनोखी प्रेमकथा आपल्या भेटीला येणार आहे.

चित्रिकरणाला सुरुवात

सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला.यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच आता लवकरात लवकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाची गोष्ट काय?

मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधरवणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. या आधी मी पती – पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. आता ‘बंधू’ च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आताच्या सोशल मिडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणे मला गरजेचे वाटले. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे ‘बंधू’ या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असं  लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी सांगितलं.

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. कार्यकारी निर्माता विनोद नाईक आहेत. तर प्रोजेक्ट हेड वैभव शिरोळकर आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून हर्षद आत्माराम गायकवाड हे लाभले आहेत. संगीत विजय नारायण गावंडे यांचे आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.

हेही वाचा :

सांगली : कॉंग्रेसच्या एकजुटीत खडे टाकणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली

गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज…

वंचितला सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर