पुण्यात ३५, शिरूरमध्ये ३२ उमेदवार रिंगणात

पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी (ता. २९) संपुष्टात आली. पुण्यातून सात, तर शिरूरमधून तीन उमेदवारांनी(candidates) माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
पुणे : पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी (ता. २९) संपुष्टात आली. पुण्यातून सात, तर शिरूरमधून तीन उमेदवारांनी(candidates) माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पुणे आणि शिरूर मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी (ता. २५) संपली.

या कालावधीत पुण्यातून ४२ आणि शिरूरमधून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (ता. २६) दोन्ही मतदारसंघांतील अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून एकही अर्ज बाद झाला नाही, तर शिरूरमधून अपक्ष ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे पुण्यातून ४२ आणि शिरूरमधून ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत पुण्यातून सात उमेदवारांनी माघार घेतली.

त्यात पुण्यातून महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी पर्यायी (डमी) अर्ज सादर केला होता, त्यांनी माघार घेतली. त्यासह एकूण सात जणांनी अर्ज माघारी घेतले. शिरूरमधून तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
तीन बॅलेट युनिट लागणार

ईव्हीएम मशिनवरील बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांसाठीच बटणाची मर्यादा आहे. एक बटण नोटा मतासाठी असते. त्यामुळे जर १५ उमेदवार रिंगणात असतील, तर एकच बॅलेट युनिट वापरावे लागते. आता पुणे मतदारसंघातून ३५ उमेदवार आणि शिरूरमधून ३२ उमेदवार रिंगणात असल्याने दोन्ही मतदारसंघांत तीन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत.

हेही वाचा :

विज्ञान-रंजन – सुएझ कालवा

दिल्लीचे अंकल आणि नवीन बाबू यांनी तुमचे पैसे लुटले;

भाजप 200 जागाही ओलांडणार नाही