‘आपले’ मतदार गेले कुणीकडे? भाजपचं टेन्शन वाढलं

मुंबई: निवडणूक कोणतीही असो भाजपचं नियोजन(tension relief) उत्तम असतं. अतिशय सूक्ष्म नियोजन सत्ताधारी भाजपचं वैशिष्ट्य राहिलंय. त्यांच्या या नियोजनाची अनेकदा चर्चा होते. हजारो पन्नाप्रमुख, बूथप्रमुख या संपूर्ण नियोजन यंत्रणेचा भाग आहेत. पण निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटल्यानं भाजपची चिंता वाढली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहांचा सर्वाधिक भर पन्नाप्रमुख, बूथप्रमुखांवर असतो. या यंत्रणेनं भाजपला अनेकदा यश मिळवून दिलं आहे.

सूक्ष्म नियोजन यंत्रणेचा अविभाज्य(tension relief) घटक असलेले पन्नाप्रमुख, बूथप्रमुख मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सक्रिय होते की नाही, असा प्रश्न घटलेल्या मतदानानंतर विचारला जात आहे. ‘आपल्या’ मतदारांची नावं मतदारयादीत नसणं आणि कमी झालेली मतदानाची टक्केवारी यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. मतदार यादीच्या एका पानावर मागे आणि पुढे अशी मिळून ६० नावं असतात. या मतदारांमागे भाजपनं एक पन्नाप्रमुख नेमला आहे. असे हजारो पन्नाप्रमुख राज्यात आहेत.

पन्नाप्रमुखाकडे एका पानावरील मतदारांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी असते. सातत्यानं संपर्क ठेवून मतदारांचे प्रश्न जाणून घ्यायचे, ते सोडवण्यासाठी पक्ष आणि सरकार पातळीवर प्रयत्न करायचे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहायचे, ही कामं पन्नाप्रमुखांना करावी लागतात. मतदानाच्या दिवशी मतदारांना प्रत्यक्ष मतदानासाठी घेऊन यायचं कामही पन्नाप्रमुखांना करावं लागतं.

मतदारयाद्यांचं एक ऍप भाजपनं तयार केलं होतं. प्रत्येक पन्नाप्रमुखाला त्याच्याशी जोडण्यात आलं. पण जुन्या मतदारयाद्यांचा आधारे हे काम करण्यात आलं. अद्ययावत मतदारयाद्या या ऍपशी जोडण्यात जोडल्या गेलेल्या नाहीत, अशा तक्रारी अनेक पन्नाप्रमुखांनी पक्षाकडे केल्या आहेत.

विदर्भातील पाच जागांवर १९ एप्रिलला मतदान झालं. त्यानंतर पक्षपातळीवर काही त्रुटी समोर आल्या. त्यात प्रामुख्यानं पन्नाप्रमुख योजनेचा उडालेल्या बोजवाऱ्याचा समावेश आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. मतदान झालेल्या पाचपैकी तीन जागा भाजपकडे असून प्रत्येकी एक जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि काँग्रेसकडे आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (23-04-2024)

1 मे पासून ‘हे’ नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

मोठी बातमी! ‘हा’ नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!