मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. कोल्हापूर(kolhapur) हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. निकालानंतर त्यांना कळेल, आम्ही निवडणूक जिंकली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.

हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी(kolhapur) यांनी आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा केली. या पदयात्रेदरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते बोलत होते.

राजू शेट्टींनी हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा केली. पदयात्रे दरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते एबीपी माझाशी बोलत होते. शाहू चौकावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि महाविकास आघाडीची रॅली समोरासमोर आली होती.

खरं पाहिलं तर आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केलं आहे. आम्ही निवडणूक जिंकली आहे असं राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा :

इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा

‘बावड्याचा पोरगा कोणासमोर झुकणार नाही’; सतेज पाटलांचा कोणाला उद्देशून इशारा?

लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले; विमानांसह हेलिकॉप्टरची 195 ‘राजकीय उड्डाणे’