महायुतीमध्ये प्रचारादरम्यान धुसफुस, गजानन किर्तिकर

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील गोरेगाव येथे अलीकडेच महायुतीचा (grand)मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार गजानन कीर्तिकर यांनी, विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपची नवी संस्कृती असल्याची टीका केली.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता महायुतीच्या मेळाव्यांमध्येही भाजप आणि(grand) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खटके उडू लागले आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतील महायुतीच्या मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपची नवी संस्कृती असल्याची टीका केल्याने आता भाजपने वायव्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उर्वरित मेळावेच रद्द केल्याचे समजते. तर दुसरीकडे ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या प्रचाराच्या सभेतील बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो नसल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील गोरेगाव येथे अलीकडेच महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार गजानन कीर्तिकर यांनी, विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपची नवी संस्कृती असल्याची टीका केली. ही टीका भाजपला चांगलीच झोंबली असून कीर्तिकरांच्या या टीकेनंतर भाजपने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उर्वरित मेळावे रद्द केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. दोन महिन्यांपूर्वी जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही कीर्तिकरांनी भाजपवर सडकून टीका केली होती. जागावाटपात शिवसेनेला लोकसभेच्या १२ जागा मिळणार असल्याची चर्चा होती. त्यावरून आम्हाला हे सूत्र मान्य नाही. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केल्याने महायुतीमध्ये पडसाद उमटू लागले आहेत.

महायुतीमध्ये खटके उडत असताना गुरुवारी आणखी एका घटनेमुळे या तणावात भर पडली. मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात गुरुवारी संध्याकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार हे उपस्थित होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सभास्थळी राजकीय बॅनर्स लागले होते. मात्र, सभेच्या ठिकाणी असलेल्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नव्हते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले.

हेही वाचा :

व्हिडिओ गेम्सचा विळखा

मुंबई रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

तंदुरुस्त राहा, आनंदी राहा