साऊथ (actor)सुपरस्टार राम चरण यांच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात चांगली कमाई करताना दिसतनाही आहे.

या चित्रपटामध्ये(actor) अभिनेता राम चरणसह बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील दिसत आहे. तसेच आता या चित्रपटाबाबत निर्माते राम गोपाल वर्मा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ज्याने ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. चित्रपटाला आतापर्यंत फक्त सकारात्मक पुनरावलोकने मिळाली आहेत. आणि आता अश्यातच त्यांच्या या विधाने नेटकरी संतापले आहेत.
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी X वर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये राम चरण अभिनीत चित्रपटावर टीका केली. चित्रपटाच्या संग्रहाबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘पुष्पा २’ बद्दल त्यांनी सांगितले की त्यांना हा चित्रपट खूप आवडला. आणि ‘गेम चेंजर’ बाबत त्यांनी वादग्रस्त विधान दिले आहे.
If G C costed some 450 cr then RRR in its extraordinary never before seen visual appeal should have costed 4500 cr and if G C film’s first day collections are 186 cr on day 1 , then PUSHPA 2 collections should have been 1,860 cr ..The point is that the fundamental requirement of…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 13, 2025
ते म्हणाले की, ‘गेम चेंजर’ पाहिल्यानंतर त्यांना अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या पाया पडायला आवडेल. ते म्हणाले, एसएस राजामौली आणि सुकुमार यांच्या लेखनाने तेलुगू चित्रपटसृष्टीला रिअल टाइम कलेक्शन नवीन उंचीवर नेले आहे.
बाहुबली, आरआरआर, केजीएफ २, कांतारा यांच्या असाधारण कामगिरीला कमी लेखण्यासाठी या उघड अपमानामागे कोण आहे हे मला खरोखर माहित नाही आणि ‘गेम चेंजर’च्या दाव्यांमुळे त्यांच्या सर्व कामगिरी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडतील.’ असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे बजेट ४५० कोटी आहे, जर आपण ‘आरआरआर’ पाहिले तर ते ४५०० कोटी असायला हवे होते. त्याच वेळी, जर ‘गेम चेंजर’चे कलेक्शन पहिल्या दिवशी १८६ कोटी रुपये असेल, तर ‘पुष्पा २’चे कलेक्शन १८६० कोटी रुपये असायला हवे होते. मुद्दा असा आहे की अशी आकडेवारी सादर करावी की सर्वकाही खरे वाटेल. ‘गेम चेंजर’ चित्रपटाबाबत हे सर्व विश्वासार्ह वाटायला हवे.’ असे ते म्हणाले.

राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे बजेट ४५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. जर आकडेवारीवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर फक्त ९७ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी कमल हासनसोबत ‘इंडियन २’ बनवला होता. परंतु हा चित्रपट सिनेमागृहात चांगली कमाई करू शकला नाही.
हेही वाचा :
VIDEO : “शिवसेनेची काँग्रेस होतेय?” शिंदे गटाने भास्कर जाधवांना दिली खास ऑफर
धक्कादायक ! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
Viral Video: मोबाईलमध्ये गुंग तरुणाचा रस्ता ओलांडताना थरारक अपघात!