खासदार संजय जाधव यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ, उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट?

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्याही नावाचा समावेश आहे. यादरम्यानच ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर संजय जाधव यांनी एक पोस्ट शेअर केली, (Shiv Sena) ज्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. त्यानंतर ठाकरे गटाने पक्षातील सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हिप जारी केले. या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. कारणे दाखवा नोटीस पक्षाने यांना पाठवली. यानंतर 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांपैकी एक परभणी लोकसभेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव हे देखील होते. अनेक वर्ष संजय जाधव शिवसेना ठाकरे गटासोबत होते. अगोदर आमदार आणि त्यानंतर सलग तीन वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. मात्र, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदे याचा हात पकडला.लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. (Shiv Sena) यात संजय जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे म्हणून संजय जाधव यांची ओळख होती. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे परभणीला पोहोचले आणि सभेमध्ये त्यांनी संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.

शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली असली तरीही संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. संजय जाधव (Shiv Sena) यांनी शेअर केलेल्या या पोस्टनंतर विविध चर्चांना उधाण आले. संजय जाधव हे कट्टरशिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे यांनी परभणीत येऊन आपल्यावर टीका केली, हा राग मनात न धरता संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.संजय जाधव यांनी शिवसेना ठाकरे गट सोडताना म्हटले होते की, पक्षाकडून बळ मिळत नव्हते. शिवाय मतदार संघात काम करण्यासाठी निधीचीही समस्या होती. परभणी आणि हिंगोलीत ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही शिवसेना ठाकरे गट सोडला. संजय जाधव यांचे परभणी मतदार संघात मोठे वर्चस्व आहे.

हेही वाचा :

दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?