इंडिया आघाडीला झंझावाती यश, भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर राहण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने(political news) मिळवलेल्या झंझावाती यशानंतर देशातल पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे भाजपसाठी सत्ता स्थापनेत महत्त्वाचे घटक ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क करण्यास सुद्धा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे काँग्रेस मुख्यालयामध्ये पोहोचले आहेत.

काँग्रेस मुख्यालयामध्ये आज राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या(political news) निकालावर भाष्य करणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला मिळालेलं यश आणि भाजप बहुमतापासून दूर राहिल्याने राहुल गांधी या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडी आणि एनडीएकडून उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वीच महत्वाच्या सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या नेत्यांना आताच फोनाफोनी केली जात आहे. त्यामुळे राहुल गांधी त्या अनुषंगाने काही बोलणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. महाविकास आघाडीवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्या मदतीने महाविकास आघाडी आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो की शेवटच्या उपायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करत राहू, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सांगितले की, “लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल अद्याप हाती आलेले नसले तरी, महाराष्ट्र याकडे पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ते म्हणाले, “महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी एकत्रितपणे आपली भूमिका जनतेसमोर मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेण्यात आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जाती-धर्म वादाच्या पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटिबद्ध आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, या निवडणूक निकालाने देशाचे चित्रही बदलले आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. यासाठी मला महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान आहे. आघाडी देशहिताच्या दृष्टीने काही पावले उचलत असेल, तर आघाडीच्या माध्यमातून सामूहिक योगदान देण्यात आपण आघाडीवर राहू. या अत्यंत कठीण लोकशाही लढ्यात महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच बरोबर या यशासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

हेही वाचा :

विश्वजीत कदमांनी करून दाखवलं, सांगलीचे ‘वाघ आम्हीच’…

अखेर कोल्हापुरकरांचे मत अन् मान गादीलाच! शाहू महाराजचं ठरले किंग

संगीता बिजलानीला भेटायला सायकल चालवत पोहचला होता सलमान खान!