‘तू कोण आहेस?’, जेव्हा करिना कपूर सर्वांसमोर दिया मिर्झावर संतापली

बॉलिवूडमध्ये दोन सेलिब्रिटींमध्ये मतांतर असणं, वाद असणं तसं काही नवं नाही. काही सेलिब्रिटींमधील वाद इतक्या टोकाला जातात, ते एकमेकांशी बोलणंही टाळतात. असाच एक वाद काही वर्षांपूर्वी अभिनेत्री(actor) करिना कपूर आणि दिया मिर्झा यांच्यात झाला होता. दिया मिर्झाने एका मुलाखतीत नेमकं काय झालं होतं याची सविस्तर माहिती दिली होती. तिने करिनाला अतार्किक, भडक आणि अयोग्य म्हटलं होतं. पण काही वर्षांनी त्यांनी 2009 मध्ये ‘कुरबान’ चित्रपटात एकत्र काम करत आपल्यातील वाद मिटवला होता.

दिया मिर्झाने Rediff ला दिलेली एक मुलाखत नव्याने व्हायरल झाली आहे. दिया मिर्झाने या मुलाखतीत करीनासह 2000 च्या सुरुवातीला लखनऊमधील एका कार्यक्रमात झालेल्या वादाबद्दल सांगितलं होतं. सहारा ग्रुपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात करिना कपूर(actor), उर्मिला मातोंडकर, नम्रता शिरोडकर आणि स्वतः दिया मिर्झा यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र आले.

“आम्ही राष्ट्रध्वजासह कॉटन पंजाबी ड्रेस घालणं अपेक्षित होतं. पण करिनाला तिने स्वत:साठी तयार केलेली घागरा चोली आणि दागिने घालायचे होते. महत्त्वाचं म्हणजे तिने राष्ट्रध्वजही घातलेला नव्हता,” असा खुलासा दिया मिर्झाने केला होता.

करिनाने ठरलेल्या ड्रेस कोडचं पालन न करण्याच्या निर्णयामुळे इतर सेलिब्रिटी अस्वस्थ झाले होते. “करीना आवश्यक असलेली एकरूपता पाळत नाही हे पाहून नम्रता [शिरोडकर] खूपच नाराज झाली. मी नम्रताला तिचा ड्रेस घेऊन बाहेर पडायला सांगितले, जेणेकरून आपण ते खाजगीरित्या तोडगा काढू शकू,” असं दिया मिर्झाने सांगितलं.

पण यानंतर गोष्टी आणखी ताणल्या गेल्या. “अचानक, करीनाला काहीतरी जाणवले. ती माझ्यावर ओरडू लागली, ‘तू कोण आहेस? नम्रताला सल्ला देणारी तू कोण आहेस?’ मी आश्चर्यचकित आणि खूप अस्वस्थ झाले. मी उत्तर न देता खोलीतून बाहेर पडले,” असं दियाने सांगितलं.

पण अर्ध्या तासाने सगळा तणाव निवळला. “अर्ध्या तासानंतर, तिचा सेक्रेटरी जतिन [जो संयोगाने दियाचा सेक्रेटरी होता] माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की करीनाला मी तयार आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे. काही मिनिटांनंतर, ती माझ्याशी असं बोलत होती की जणू काही घडलंच नाही.यावरुन मी असा निष्कर्ष काढला आहे की करीन ही एक मुलगी आहे जी कधी अविवेकी, आणि मोठ्याने बोलणारी आहे ज्याची तिला स्वत:ला कल्पना नसते”, असं दिया म्हणाली.

हेही वाचा :

इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी संधी – Aditya Tutorials कडून प्रवेश प्रक्रिया सुरू

‘मी डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला, कोणीच ऐकलं नाही अन्…’ इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने सांगितला थरार