भारताचा संघाने मागील महिन्यांत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे(Trophy) सामने खेळले, त्याआधी भारताचा संघाची घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका झाली होती. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताच्या संघाने निराशाजनक कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर भारताचे कोच आणि बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळण्याचे आदेश दिले होते.
सध्या भारतामध्ये रणजी ट्रॉफीचे(Trophy) सामने सुरु आहेत. यामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय संघातील युवा खेळाडूंपासून ते टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मापर्यत सर्व खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. पण काही खेळाडू देशांतर्गत सामन्यातही फार काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत.
भारताचा संघ लवकरच युएईला चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी जाणार आहे. त्याआधी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची सलामीची जोडीदार यशस्वी जैस्वाल यांनी एक मोठा निर्णय घेतला असून, दोन्ही खेळाडूंनी मुंबईच्या पुढील रणजी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धची आगामी एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. रोहित १० वर्षांनंतर रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी आला होता.
रोहित-यशस्वी यांनी मुंबईच्या संघ व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली आहे. जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात रोहित मुंबईसाठी दिसला, जिथे त्याने दोन्ही डावात मिळून ३१ धावा केल्या. पहिल्या डावात त्याला केवळ तीन धावा करता आल्या, तर दुसऱ्या डावात त्याने २८ धावांचे योगदान दिले. या सामन्यात स्टार खेळाडू असूनही संघाचा पाच गडी राखून पराभव झाला. ३० जानेवारीला होणाऱ्या पुढील सामन्यात संघाला मेघालयचा सामना करायचा आहे.
रोहितप्रमाणेच जैस्वालही जम्मू-काश्मीरविरुद्धच्या पहिल्या डावात स्वस्तात बाद झाले, जिथे त्याने चार धावा केल्या. दुसऱ्या डावातही त्याची बॅट चमत्कार करू शकली नाही, जिथे त्याने २६ धावांची खेळी केली. आपणास सांगूया की यशस्वीने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसह प्रथमच वनडे संघात प्रवेश केला आहे. याशिवाय, तो भारताच्या १५ सदस्यीय चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा देखील एक भाग आहे.
Mumbai was winning everything at the Domestic level from Irani Cup to Ranji Trophy to SMAT and then Rohit Sharma comes and they lose to Jammu Kashmir ☠️ pic.twitter.com/4oI8TqCypN
— Dinda Academy (@academy_dinda) January 25, 2025
जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्याने रोहित दहा वर्षांच्या कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. भारतीय संघाचा कर्णधार असूनही रोहितने या सामन्याचे नेतृत्व केले नाही. या जबाबदारीसाठी संघाने अजिंक्य रहाणेची निवड केली. रोहितने या सामन्यात खेळायला सुरुवात करताच, गेल्या १७ वर्षांत रणजी ट्रॉफी(Trophy) सामन्यात भाग घेणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. असे करणारा शेवटचा कर्णधार अनिल कुंबळे २००८ मध्ये रणजी सामना खेळला होता.
हेही वाचा :
सरकारी योजनांमुळे निवृत्तीनंतर मिळवा महिन्याला 1 लाख पेन्शन; कोट्याधीश होण्याची संधी
मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आता सरकार…
तर जागीच गेला असता जीव! तरुणांनी गॅस स्टोव्हवर केलं असं काही…; VIDEO पाहून उडेल थरकाप