महाराष्ट्रात मान्सूनने वेगाने प्रगती करत अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला (monsoon) असून वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामानातील अचानक बदलामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

दुहेरी हवामान प्रणालीचा राज्यावर प्रभाव हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्याच्या उत्तरेकडील भागात दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्याने वातावरणात मोठे बदल होत आहेत. या प्रणालींमुळे निर्माण झालेला दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून(monsoon) त्याचवेळी अरबी समुद्रातून येणारा मान्सूनचा प्रवाह राज्यातील उर्वरित भागांमध्ये विस्तारत आहे. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विशेषतः डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसह समुद्रकिनारी असलेल्या प्रदेशांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी दमटपणा आणि उकाडा कायम असल्याने नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात तुलनेने कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही भागांमध्ये तापमान वाढण्याचाही अंदाज आहे. मान्सून दाखल झाल्यानंतरही जून महिन्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्रात ऊन आणि पावसाचा मिश्र अनुभव कायम राहणार आहे. (monsoon) दरम्यान, मुंबई , ठाणे आणि पालघर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. या भागात 10 जूननंतर मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात, त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, पालघरमध्ये उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’