कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा नव्या वर्षाच्या (politics) पहिल्या दिवसापासून राज्यभर सुरू होती. आता अजित दादा पवार यांचे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारामती विमानतळाजवळच अपघाती निधन झाल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले होते आणि आता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत भागीदारी केल्याने दुखवटा राहिला बाजूला आणि राजकारणच अधोरेखित व्हायला लागले आहे.माजी मंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फोडले. अजितदादा पवार यांनी जानेवारी महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले पाहिजे ही आपली इच्छा असल्याचे माझ्याशी बोलताना सांगितले होते.असे जाहीरपणे सांगितले ते अजित दादा पवार यांच्या निधनानंतर. जयंत पाटील आणि अजित दादा यांची अधून मधून भेट होतच असते. कोणत्या भेटीत दादांनी विलीनीकरणाची इच्छा बोलून दाखवली होती आणि त्यावेळी अन्य कोणी राजकीय नेता उपस्थित होता काय? याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही आणि जयंत पाटील बोलतात ते सत्यच बोलतात हे सांगायला दुर्दैवाने आज अजितदादा नाहीत.

शरद पवार यांनी अजितदादांची विलीनीकरणाची इच्छा होती(politics) आणि आमचीही तशीच इच्छा आहे. असे मीडियाशी बोलताना सांगितले असले तरी ती त्यांची गुगली ही असू शकते. कारण त्यांचे राजकारण आज पर्यंत कुणालाही स्पष्टपणे आणि स्वच्छपणे समजलेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलीनीकरण होईल असे क्षणभर गृहीत धरले तरी शरद पवार यांची एनडीए बद्दल काय भूमिका राहणार? कारण त्यांच्या राजकारणाचे अलीकडचे भाजपला कडाडून विरोध हे सूत्र राहिलेले आहे. जयंत पाटील यांनी याबद्दलही खुलासा केला पाहिजे. कारण ते म्हणतात त्याप्रमाणे अजितदादा यांची विलीनीकरणाविषयीची इच्छा होती तर मग एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस हा एन डी ए चा घटक पक्ष राहणार कि, इंडिया आघाडीला साथ देणार याबद्दलही चर्चा झालीच असणार. विलीनीकरणाबद्दलच्या कोणत्या अटी शर्ती ठरल्या होत्या याचा खुलासा शरद पवार किंवा जयंत पाटील यांनी केला असता तर चांगले झाले असते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तर शपथ घेऊन सांगितले आहे की अजित दादा पवार यांनी विलीनीकरणाविषयीची स्वच्छ भूमिका घेतली होती.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र (politics)फडणवीस यांनी विलीनीकरणाची चर्चा फोल ठरवली आहे. अजितदादा पवार आणि माझ्यात नेहमी संवाद असायचा आणि संपर्कही असायचा. ते अनेक गोष्टी माझ्याशी शेअर करत असत.त्यामुळे अजितदादा पवार यांनी विलीनीकरणाची व्यक्त केलेली इच्छा निराधार आहे. त्यांनी मला आधी सांगितले असते. पण तसे त्यांच्याकडून घडलेली नाही असे सांगून विलीनीकरणाच्या राजकारणात आपली भागीदारी नोंदवली आहे. वास्तविक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हा त्या दोन्ही गटाचा अंतर्गत मामला आहे. आपला राजकीय अजेंडा अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांना का सांगतील? आणि त्या पक्षांच्या अंतर्गत बाबीत फडणवीस यांनी लक्ष का घालावे?
असे या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतात. रोहित पवार यांनी तेरा दिवसांचा (politics) दुःखवटा संपल्यानंतर मी यासंदर्भात बोलेन असा खुलासा करताना, आम्ही अजितदादा यांच्या आकस्मिक निधनाने दुःखी आहोत आणि दुःखात आहोत हे सांगण्यामागे त्यांचा हेतू कोणता याबद्दलही आता वेगळे सांगायला नको. आपल्या भारतीय किंवा हिंदू संस्कृतीमध्ये जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीचे संदर्भ देऊन काही भाष्य करायचे नसते हे सांगितलेलं आहे. कारण त्या चर्चेबद्दल खुलासा करायला संबंधित व्यक्ती हयात नसते. आता दोन्ही गटाच्या विलीनीकरणाबद्दलची आपली इच्छा आहे असे अजितदादा यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलताना सांगितले असले तरी, त्यावर शिक्कामोर्तब करायला ते हयात नाहीत.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढप