राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 10 निर्णय, शेतकऱ्यांसाठी ‘हे’ ठरेल महत्त्वाचे

राज्य मंत्रिमंडळाच्या(cabinet) बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस बैठकीला उपस्थित नव्हते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाइन बैठकीला हजेरी लावली असून राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यामध्ये काटोल, आर्वी, पैठण येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, गंगापूर येथील जिल्हा अतिरिक्त न्यायालय, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील(cabinet) निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. विहिरी, शेतळे, वेज जोडण्यासाठी भरघोस अनुदान देण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम : पुणे- छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

पशुसंवर्धन विभाग : अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

वस्त्रोद्योग विभाग : शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

कृषी विभाग : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

महिला व बालविकास : अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

कामगार विभाग : औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

पशुसंवर्धन विभाग : थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करणा

जलसंपदा विभाग : धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

विधी व न्याय विभाग : काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय, हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

मदत व पुनर्वसन : लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे

कृषी विभाग : राज्यात 121 टक्के पेरण्या

जलसंपदा विभाग : राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली

महिला व बालकल्याण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे 1 कोटी 60 लाख लाभार्थी महिलांना आतापर्यंत 4787 कोटींचे वाटप

हेही वाचा:

गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का? 

मृत्यूशी लढतोय ‘हा’ स्टार क्रिकेटर, ICU मध्ये दाखल

अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार की सुटका?