लग्न करण्यासाठी टाळाटाळ करताय? रिसर्च काय सांगतो वाचा, पत्नी मिळाल्यानंतर पुरुषांचं आयुष्य…

लग्न संस्था ही भारतीय परंपरेत अतिशय महत्त्वाची आहे. धर्म धर्मात विवाहला विशेष स्थान आहे. याच लग्नाचे अनेक प्रथा आणि परंपरा देखील आहे. पण लग्न(married) म्हणजे दोन जीवाच आणि सोबत दोन कुटुंबाच मिलन असतं. पण हल्ली या विवाहसंस्थेपासून तरुणाई पळताना दिसून येत आहे. तरुणाई कल हा लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये राहण्याकडे वळला आहे.

पण नुकताच झालेल्या एका रिसर्चमध्ये एक आश्चर्यचकित करणारी बाब आहे. या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, लग्नानंतर पुरुषांचं आयुष्य वाढतं. धर्माशास्त्रानुसार महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेचं व्रत करतात. यंदा 10 जूनला वट पौर्णिमाचा उत्साह असणार आहे. पण लग्नानंतर पुरुषांचं आयुष्य कसं वाढतं पाहूयात काय सांगतो अभ्यास.

अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, विवाहित पुरुष हे अविवाहित किंवा जोडीदाराशिवाय जगणाऱ्या पुरुषांपेक्षा निरोगी आणि जास्त काळ जगतात. या अभ्यासातून असा ही दावा केला आहे की विवाहित पुरुष आणि महिलांच्या वयावर होणारा परिणाम वेगवेगळा पाहिला मिळाला आहे. जिथे विवाहित(married) पुरुष अविवाहित पुरुषांपेक्षा कमी वयाचे दिसतात. पण महिलांच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी पाहिला मिळाली आहे.

जे पुरुष त्यांच्या जोडीदारासोबत राहतात ते जास्त काळ जगतात. याउलट, विवाहित महिलांमध्ये वृद्धत्वाचा अनुभव अविवाहित महिलांपेक्षा फारसा वेगळा नव्हता. अभ्यासानुसार, घटस्फोटित किंवा विधवा महिलांची वृद्धत्वाची प्रक्रिया अविवाहित महिलांपेक्षा जास्त कठीण असते.

हा अभ्यास कॅनडामधील वृद्धांवर आधारित होता, ज्यामध्ये 45 ते 85 वर्षे वयोगटातील लोकांच्या आरोग्याचा आणि जीवनशैलीचा 20 वर्षे मागोवा घेण्यात आला. यामध्ये, विवाहित असण्याचा किंवा अविवाहित असण्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि वृद्धत्वावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, लग्नाचा जीवनावर होणारा परिणाम पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळा असू शकतो. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की वय वाढत असताना लग्नाचे महत्त्व केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावर पाहिला मिळतो.

हेही वाचा :