बाबा वेंगांचं भयंकर भाकीत! २०२५ मधील ‘ती’ तारीख समोर, मोठा विस्फोट होणार!

सध्या जगभरात घडणाऱ्या अस्थिर घटनांमुळे अनेकांच्या मनात भविष्याविषयी चिंता निर्माण झाली आहे.(date )या पार्श्वभूमीवर बल्गेरियाच्या सुप्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या 2025 मधील भाकिताने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते, 7 जून 2025 या तारखेनंतर जगात मोठा बदल होणार असल्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता.बाबा वेंगांच्या या भाकीतानंतर सोशल मीडियावरही चर्चा रंगू लागली आहे. अनेकांनी या भविष्यवाणीला समर्थन दिलं असून काहींनी त्यावरील भीती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्रातसुद्धा 7 जून 2025 या तारखेचं मोठं महत्त्व सांगितलं जात आहे. कारण त्यादिवशी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो. यामुळे राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बाबा वेंगा कोण होत्या आणि त्यांनी काय भाकीत केलं? :
बाबा वेंगा (Baba Vanga) यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला होता. एका वादळात दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या या अंध स्त्रीला दिव्य दृष्टि प्राप्त झाली आणि त्यांनी अनेक घटना अचूकपणे भाकीत केल्या, असा दावा त्यांच्या अनुयायांनी केला आहे. हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा अंत, 9/11चा हल्ला, (date )आणि जपानमधील त्सुनामीसारख्या घटनांचं त्यांनी पूर्वीच भाकीत केल्याचं सांगितलं जातं.

आता त्यांच्या समर्थकांनी एक नवं भाकीत समोर आणलं आहे. 2025 नंतर जग दोन भागांमध्ये विभागले जाईल, असा दावा वेंगांनी केल्याचं सांगितलं जातं. त्यातील एक भाग अध्यात्मिक समाधानाच्या शोधात असेल, तर दुसरा भाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे झुकलेला असेल. हे दोन्ही मार्ग एकमेकांपासून वेगळे पण एकाच काळात अस्तित्वात असतील, असं हे भाकीत आहे.

बाबा वेंगांचं हे भाकीत नसून, त्यांनी दक्षिण गोलार्धात एक प्रचंड विस्फोट होणार (date )असल्याचंही सांगितलं आहे. त्यासोबतच पाण्यात विष मिसळल्याने एक नवा संसर्गजन्य आजार निर्माण होईल, असंही ते म्हणाल्या आहेत. हा आजार जलप्रदूषणातून पसरू शकतो आणि त्याचा व्यापक परिणाम मानवी आरोग्यावर होईल.

या भविष्यवाणीमुळे जगभरातील अनेक देश, सरकारे आणि नागरिक अधिक सजग होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अर्थातच, हे भाकीत खरं ठरेल की नाही याचा निर्णय भविष्यातच होईल. मात्र या इशाऱ्यांमुळे अनेकांना आपल्या जीवनशैलीचा, तंत्रज्ञानाच्या वापराचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा नव्याने विचार करावा लागत आहे.

हेही वाचा :