अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय! धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा 

अलमट्टी धरणातून(Dam) पाणी सोडण्याविषयी धरण प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून कृष्णा आणि घटप्रभा नदीत पूर्व मान्सूनमुळे झालेल्या पावसाने विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे .यासंबंधी धरण प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.

आज सायंकाळी (29 मे) पाच वाजल्यापासून अलमट्टी धरणातून नदीपात्रात 10 हजार क्युसेक चा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे . हा विसर्ग हळूहळू 20,000 क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता असून अलमट्टी धरणाच्या प्रवाहात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय .

अलमट्टी धरणातून(Dam) विसर्ग झाला की कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये संभाव्य पुराची स्थिती निर्माण होते . यासंदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवत एकत्र येण्याचे प्रयत्न केली असून दरवर्षी पावसाळ्यात तयार होणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधित उपाययोजना ठरवण्यासाठी बैठकही घेण्यात आली होती .

पंचगंगा आणि कृष्णा नदीतील पाण्याची पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन, अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती अशा अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

दोन्ही राज्यातील जलस्त्रोत विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन यापूर्वस्थापनावर ठोस उपाययोजना करण्याचे ठरवले . दरम्यान दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची आज संयुक्त बैठक घेण्यात आली .या बैठकीत कृष्णा नदी कल्लोल मॅरेज आणि घटप्रभा नदीचे लोळसुर ब्रिज या भागात पडत असलेल्या पूर्व मान्सून पावसामुळे आणि त्यातून होणाऱ्या विसर्ग मुळे अलमट्टी धरणात पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे असे धरण प्रशासनाने कळवले आहे .

त्यामुळे 29 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून नदीमध्ये दहा हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे .हा विसर्ग हळूहळू 20 हजार क्युसेक पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे .त्यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील प्रवाहात येणाऱ्या सर्व संबंधितांनी सतर्क रहावे असे धरण प्रशासनाने कळवले आहे . धरणातील पाणी पातळीबाबत कर्नाटक राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधी वारणा, कोयना धरण व राजापूर बंधाऱ्यावर तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी अलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी असतील.

हेही वाचा :

प्रसिद्ध गायकचा कार अपघातात मृत्यू…

रेशन कार्डधारकांना आता दरमहा 1000 रुपये मिळणार! लगेच तपासा पात्रता आणि अर्ज करा

हार्ट अटॅकपासून दूर राहायचं असेल तर ‘या’ 4 तेलांचा वापर टाळा