गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, हवामान खात्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी मुसळधार पावसाचा(rain) अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यापासून पावसाने(rain) विश्रांती घेतल्यामुळे उकाड्याचा त्रास वाढला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. या भागांमध्ये पुरस्थिती उद्भवू शकते, तसेच सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला चांगली सुरुवात झाल्यानंतर जून महिन्याच्या मध्यावर पावसाचा (rain)जोर कमी झाला होता. पण आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कोकणसह मुंबईत हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. मुसळधार पावसामुळे दळणवळणात अडथळे निर्माण होऊ शकतात.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या भागांतील रहिवाशांनीही पुराचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी. काही भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना प्रवासाचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी. एकूणच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात दमदार मान्सून अनुभवास मिळणार असून, पावसामुळे थंडावा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
पांडुरंगाच्या मर्जीने राजकारणात उलथापालथ होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री…
जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत संजय कपूर, करिश्माच्या Ex नवऱ्याचा अखेरचा VIDEO समोर!
एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या, थोबाडीत मारल्या अन्…; लोकलमध्ये महिलांची रक्तबंबाळ हाणामारी