26 मे रोजी मुंबईत धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने आपला जलवा दाखवला. (arrived )महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.मुंबईतून गडचिरोलीमार्गे विदर्भात प्रवेश घेतल्यानंतर मान्सून अचानक शांत झाला. सध्या महाराष्ट्राच्या निम्म्या भागातच त्याचा प्रभाव आहे. उत्तर भागांत मात्र त्याची वाट पाहणे सुरूच आहे.
खानदेश,उत्तर नाशिक आणि विदर्भाचा काही भाग हे मान्सूनपासून अद्याप वंचित आहेत. (arrived )अनुकूल परिस्थिती अभावी मान्सूनचा वेग मंदावला आहे. असं हवामानशास्त्रज्ञ सांगत आहेत.राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली आहे. पण आता ते पेरणीसाठी नियमित पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षीचा हाच काळ शेतीची आशा आणि चिंता दोन्ही घेऊन येतो.
9 जूनला कोकणात तुरळक पाऊस पण 10 ते 12 जून दरम्यान पावसाचा वेग कमी राहील.(arrived )13 जूनपासून मृग नक्षत्राच्या प्रारंभासह मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा :