मित्रांनीच केला मित्राचा घात; वाहत्या पाण्यात टाकले अन्…

पुणे : कॅनोलच्या शेजारी बसून पार्टी करत असताना मित्रांमध्ये(Friends ) किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मित्रांनी एका मित्राला वाहत्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी (२०२४) घडलेल्या या घटनेत हडपसर पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खूनाचा प्रकार उघडकीस आणला आहे.

विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) व अशिष अशा दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर पोलिसांत हसीना शिकलगार (वय ३६) यांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी (४ मे २०२४) रोजी विनोद व वैभव आणि अशिष असे तिघेजन उन्नतीनगर येथील कॅनोललगत पार्टी करण्यासाठी बसले होते. पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात वाद झाले. विनोद याच्याशी दोघांचे वाद झाल्यानंतर त्यांनी विनोदला(Friends ) वाहत्या पाण्यात टाकून दिले. यात विनोद याचा मृत्यू झाला. याप्रकरणात हडपसर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, विनोद यांच्या पत्नीने पतीचा खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणात साक्षीदारांकडे व दोघांकडे चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांचा संशय वाढला. डॉक्टरांनी देखील रिपोर्ट बुडवून मारल्याचा दिला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

हेही वाचा :