कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जातात. पण त्याची तितक्याच तातडीने अंमलबजावणी केली जात नाही आणि मग दुर्घटना(accident) घडून गेल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग येते, तेव्हा अनेक निष्पाप जीव बळी पडलेले असतात.

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा परिसरातील लोखंडी पूल कोसळून त्यामध्ये चौघा जणांचा जीव गेल्यानंतर(accident) हे भीषण वास्तव समोर आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, जखमीवर मोफत उपचार, घडलेल्या घटनेची चौकशी हे सर्व उपचार शासनाकडून पार पाडले जातील पण गेलेले जीव परत येणार नाहीत.
इंद्रायणी नदीवर कुंडमळा परिसरात सुमारे 40 वर्षांपूर्वी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. त्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. हा पूल धोकादायक आहे. नव्याने पुलाची बांधणी केली पाहिजे असा शासन निर्णय झाला होता. नव्या पुलाच्या बांधकामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कागदावरची ही वस्तुस्थिती हा जीर्ण झालेला पूल कोसळल्यानंतर पुढे आलेली आहे.
वाहतुकीसाठी पूल आता सक्षम राहिलेला नाही. तो जीर्ण झालेला आहे. म्हणून मग तो वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक होते. लोकांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. तथापि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि ही दुर्घटना(accident) घडली. या घटनेला जेल जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण या मंडळींना अर्थात या अधिकाऱ्यांना या पुलाविषयी माहिती होती. तो धोकादायक आहे याची जाणीव होती. तो केव्हाही कोसळेल याचा अंदाज होता आणि तरीही त्यांनी लोकांच्या जीविताशी खेळ केला. आणि म्हणूनच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. यंदा मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्राला दणका दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धोकादायक पूलांची पाहणी करणे आवश्यक होते. अशा प्रकारची पाहणी कुंडमळा परिसरातील या लोखंडी पुलाची केली गेली असती तर लोकांचे नाहक जीव गेले नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेची दखल घेतल्यानंतर राज्य शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
लोखंडावर हवामानाचा प्रतिकूल परिणाम होत असतो. त्याला गंज चढत असतो. वजन पेलण्याची ताकद कमी होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे लोखंडी पूल असतील तर त्याची देखभाल दरवर्षी केली गेली पाहिजे(accident). या पुलाची देखभाल करण्यात आलेली नव्हती. तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. हे माहीत असूनही या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आलेली नव्हती. हा पूल कोसळला तेव्हा या पुलावर अनेक पर्यटक होते. काही वाहने होती.

परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटरसायकल स्वारांची पुलाच्या मधोमध वादावादी झाली. त्यामुळे अन्य वाहने खोळंबून राहिली. याचवेळी हा पूल हलत होता. काहीतरी अघटीत घडणार याची जाणीव पुलावर थांबलेल्या पर्यटकांना झाली होती. पण त्यांना वाहतुकीच्या कोंडीमुळे पुलावरून सुरक्षित ठिकाणी जाता आले नाही. आपण कोसळला. चौघा जणांचा जीव गेला. 50 पेक्षा अधिक जखमी झाले.
महाराष्ट्रात अशा प्रकारचे अनेक लोखंडी पूल अनेक जिल्ह्यात आहेत(accident). काही ओढ्यांवर लोखंडी साकव आहेत. ग्रामीण भागात लोकांना ये जा करण्यासाठी या लोखंडी साकवांचा उपयोग होतो. पण त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होतेच असे नाही. आता अशा प्रकारचे विस लोखंडी पूल विदर्भात आहेत आणि ते जीर्ण झालेले आहेत. असे धोकादायक पूल आणि साकव बंद केले पाहिजे. वाहतुकीसाठी, लोकांना ये जा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. अशा उपाययोजना केलेल्या असतात, पण त्या कागदावरून अंमलबजावणीसाठी खाली उतरत नाहीत. मग असा एखादा पूल कोसळल्यानंतर प्रशासनाला जाग येते. पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
हेही वाचा :
जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग अन् बरंच काही
घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर नागा चैतन्य-समांथा पुन्हा एकत्र! चाहत्यांसाठी गुडन्यूज
‘माझी बायको म्हणते कुठून याची इतकी…’; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर…