केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं.(loved)मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श मानलं जातं. परंतु, केळा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नावर आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. चला जाणून घेऊया, नेमकं कोणता नियम पाळावा आणि काय करावं टाळावं.

आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदानुसार, केळं हे थंड प्रकृतीचं फळ मानलं जातं. यामुळे शरीराला थोडी शितलता मिळते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन C यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. पण त्याचबरोबर, त्याचे थंड गुणधर्म पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार, केळा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणं टाळावं, कारण यामुळे पचन क्रिया मंद होऊ शकते आणि खालील त्रास उद्भवू शकतात:
- पोटात गॅस होणं
- अपचन होणं
- घशात खवखव
- सर्दी किंवा खोकला वाढणं
पाणी प्यायचंच असेल तर काय करावं?
जर तुम्हाला खूप तहान लागली असेल आणि पाणी पिणं टळणं शक्य नसेल,(loved) तर गुनगुणं पाणी पिणं चांगला पर्याय ठरतो. हे पाणी पचनक्रियेला मदत करतं आणि कुठल्याही प्रकारचा गॅस, ऍसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. पाणी पिण्याचा योग्य वेळ म्हणजे केळा खाल्ल्यानंतर 20–30 मिनिटांनी.

आधुनिक विज्ञानाचं मत काय आहे?
सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, केळ्यानंतर पाणी पिणं तसं हानिकारक नसतं, (loved)परंतु ज्यांचं पचन नाजूक आहे किंवा ज्यांना आधीपासूनच गॅस्ट्रिक समस्यांचा त्रास आहे, त्यांनी थोडा संयम ठेवलेला चांगला. काही डॉक्टर यावर हेही सांगतात की, पाचक तंत्र व्यवस्थित काम करावं यासाठी एखादा वेळ द्यावा, म्हणजे केळ्याचे पोषण घटक व्यवस्थितपणे शरीरात शोषले जातील.
केळा खाण्याचे फायदे
- पचनतंत्र सुधारतं
- हाडं मजबूत होतात
- हृदयासाठी फायदेशीर
- रक्तदाब नियंत्रणात राहतो
- स्नायूंच्या वेदना कमी होतात
- लगेच ऊर्जा मिळते
हेही वाचा :
भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य
फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
लॉर्ड्सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना