नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी किंवा नोकरी(Job) टिकून राहील की नाही अशी चिंता सतावणाऱ्यांसाठी केंद्राकडून केली जातेय एका खास योजनेची आखणी. जागतिक आर्थिक मंदीचं सावट पाहता दर दिवशी बड्या संस्थांमधून मोठ्या संख्येनं कर्मचारी कपातीचे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कारणीभूत ठरत असून यंत्रमानवी बुद्धिमत्तेच्या वापरामुळं मनुष्यबळावर केला जाणारा खर्च कमी करण्यावर अनेक संस्थांचा भर दिसून येत आहे.

याच कारणानं अनेक मोठ्या हुद्द्यांवरील आणि तितक्याच बड्या पगाराच्या नोकऱ्यासुद्धा(Job) अनेकांना गमवाव्या लागल्याचं दाहक वास्तव गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं. जगभरातील अनेक नोकऱ्या संकटात असतानाच आता भारतातसुद्धा हेच चित्र दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना एक सकारात्मक बाब नुकतीच समोर आली असून, ही बाब येत्या काळातील तरुणाईसाठी खऱ्या अर्थानं जॅकपॉट ठरणार आहे.
भारतात येत्या काळात सेमीकंडक्टर क्षेत्रात मात्र हजारो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून, मीकंडक्टरच्या उत्पादनात भारताला जागतिक स्तरावर इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीनं कार्यक्षम करण्याच्या हेतूनं ही पावलं उचलली जात आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी दृष्टीनं उचलल्या जाणाऱ्या या पावलांनुसार 2030 पर्यंत भारताकडून या क्षेत्रात अर्थात जागतिक स्तरावर होणाऱ्या चिप बाजारपेठेत 8.3 लाख कोटी ते 9.13 लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याचा मानस आहे.
सेमीकंडक्टर प्रोग्रॅम्स आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, वेदांता-फॉक्सकॉन, आयएमईसी (बेल्जियम), लेटी (फ्रान्स), टीएसएमसी (तैवान) यांच्यासोबत भागीदारीसाठी हालचाली सुरू असून भारताकडूनही त्यासाठी सातत्यानं भरिव योगदान देत भारतीयांसाठी अधिकाधिक रोजगार निर्मितीचं लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक देशांमध्ये कर्मचारी कपात होत आहे, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे. मात्र, भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात नव्या रोजगार संधी निर्माण होत असल्याने सकारात्मक चित्र दिसत आहे
भारतात येत्या काळात सेमीकंडक्टर क्षेत्रात लाखो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या क्षेत्रातील उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.भारताने 2030 पर्यंत सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक चिप बाजारपेठेत 8.3 लाख कोटी ते 9.13 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक, मोठ्यांनाही आवडेल पदार्थ
वयाच्या १७ व्या वर्षी केले बॉलीवूडमध्ये पदार्पण; हिट चित्रपट देऊन झाली चाहत्यांच्या मनातली राणी
ओव्हल टेस्ट जिंकवणाऱ्या सिराजचा भाव वाढला, BCCI कडून किती पैसे मिळणार ?