कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये,(Dam) यासाठी बंधाऱ्यांमध्ये असणारे लाकडी बरगे काढण्याचे काम सुरू आहे, तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचीही डागडुजी केली जात आहे.अवकाळी, वळीव तसेच मॉन्सूनपूर्व झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने शिल्लक राहिला आहे. राधानगरी धरणात गेल्यावर्षी १३ जून २०२४ रोजी एकूण पाणीसाठ्याच्या २४ टक्के पाणीसाठा होता आज तो ५२.७० टक्के शिल्लक राहिला आहे. हीच परिस्थिती इतर धरणांची व लघु पाटबंधाऱ्यांची आहे.

जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी बंधाऱ्यांमध्ये असणारे लाकडी बरगे काढण्याचे काम सुरू आहे, तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचीही डागडुजी केली जात आहे. झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अवकाळी, वळीव आणि मॉन्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे पचंगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले होते.
दरम्यान, तरीही पावसाने पाठ सोडली नाही. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला. जून महिन्यात सरासरी २० ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असतो. यावर्षी मात्र ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. यातच पावसाने थैमान घातले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी वाढणार आहे.(Dam)धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.‘नद्यांवर असणाऱ्या बंधाऱ्यांचे बरगे काढले जात आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी करण्याचे नियोजन केले आहे. लवकरच हे पाणी कमी होईल. दरम्यान, त्याआधी आवश्यक असणारी कामे करून घेतली जात आहेत.
२४ तासात ६७ मि.मी. पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी अतिवृष्टी होऊन पावसाने अक्षरश: झोडपले. सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात तब्बल ६७ मि.मी. पावसाची नोंद झाली. आज दिवसभरात मात्र अतिवृष्टीचा इशारा असूनही पावसाने उघडीप दिली. सायंकाळी हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्याने उद्या, (Dam)शनिवारी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र दाणादाण उडाली. शेतकऱ्यांची सुरू असलेली पेरणीची कामे पुन्हा खोळंबली. आज पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु दिवसभरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याचे पाहायला मिळाले. बराचवेळ कडकडीत ऊन पडले होते. सायंकाळी शहरासह ग्रामीण भागात काहीकाळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात एक इंचाने घट झाली आहे. रात्री दहा वाजता ही पाणी पातळी राजाराम बंधारा येथे १३ फूट तीन इंच इतकी राहिली. या नदीवरील रुई व इचलकरंजी हे बंधारे पाण्याखाली आहेत.
पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची मि.मी.मध्ये नोंद चोवीस तासांतून एकदाच केली जाते. प्रशासनाच्या नियोजनानुसार दररोज सकाळी आठ वाजता चोवीस तासात पडलेल्या पावसाची नोंद करून ती जाहीर केली जाते.
हेही वाचा :