शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा आणि उद्धव ठाकरे(political updates) यांच्या शिवसेनेचा मेळावा काल मुंबईत पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपालल्या मेळाव्यातून टीकाटिपण्ण्यां झाल्या. या मेळाव्यात, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत विधानसभेत जनतेने तुम्हाला गाडून टाकल्याची टीका केली. इतकेच नव्हे तर, युतीसाठी ते लाचार झालेत.

हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे किती आगतिक झालीये हे आपण पाहत आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल,असे अस्पष्ट संकेत दिले. या मेळाव्यानंतर मनसेकडून काय प्रतिसाद मिळणार, याकडे लक्ष लागले होते. अखेर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत थेट शिंदेंना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदेंच्या(political updates) मेळाव्यानंतर राजू पाटील यांनी ट्विट करत शिंदेंवर टीका केली आहे. ” ‘मी आणि माझा बबड्या…..मेळावा संपला!” इतकेच नव्हे तर, अभ्यासक्रमात पहिलापासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरूनही राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. “शिवसेना पक्ष, शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणारे, सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या “मराठी” भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेच्या बाबत आपली भूमिका मांडताना का दिसत नाहीत?” असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यास मनसेने महायुतीला खुला पाठिंबा दिला होता. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार राजू पाटील यांनी केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत केलेली मदत लक्षात ठेवून श्रीकांत शिंदे विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा होती. पण विधानसभेला शिंदे गटाने आपला उमेदवार राजू पाटील यांच्या विरोधात उतरवून त्यांचा पराभव केला. त्यामुळेही राजू पाटील यांच्या मनात श्रीकांत शिंदेंविषयी राग असल्याची चर्चा आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच होणार, पण काहीजणांना मराठी माणूस एकत्र आलेला नको, म्हणून हॉटेलमध्ये गाठीभेटी सुरू आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला. पण मनसेसोबत युतीचे अस्पष्ट संकेतही त्यांनी दिले. मनसेसोबत युतीसाठी लाचार… महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होणार पण काही जणांना मराठी माणूस एकत्र आलेला नको आहे म्हणून हाॅटेलमध्ये गाठीभेटी घेतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे(political updates) यांनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा एक आठवणीचा किस्सा सांगितला. 1992 साली मुंबईत दंगल उसळली होती, तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी छातीचा कोट करून मुंबईचं रक्षण केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.ते पुढे म्हणाले, “त्यावेळी एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली आणि म्हणाली – ‘बाळासाहेब, आता पुरे झालं.’ ती व्यक्ती आता हयात नाही आणि मी त्याचं नाव घेणार नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी नाना पाटेकरच्या ‘प्रहार’ या चित्रपटातील एक डायलॉग ऐकवला होता.”
या आठवणीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावत थेट आव्हानच दिलं. ते म्हणाले, “नाना पाटेकर त्या चित्रपटात गुंडासमोर उभा राहून म्हणतो – ‘कम ऑन, किल मी’. त्याचप्रमाणे, मी देखील गद्दारांसमोर उभा राहून म्हणतो – ‘कम ऑन, किल मी’. असेल हिंमत, तर या अंगावर. पण लक्षात ठेवा, अंगावर याल तर रुग्णवाहिका घेऊन या, कारण येताना सरळ याल, पण जाताना आडवं होऊन जाल.”
हेही वाचा :
आवडत्या महिलेसोबत लग्न करुनही पुरुष का करतात Extra Marital Affair?
कोल्हापूरात पतीसोबत भांडण पत्नी लेकरांसह घरातून निघाली अन्, तळ्यात मारलेली उडी ठरली अखेरची…