पंचगंगा नाही गटारगंगा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्मोकॉल असा तब्बल ५० टन कचरा नदीत

कोल्हापूर शहरासह परिसरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा(bottles) नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून राजाराम बंधारा येथे जमा झाला. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्मोकॉल असा तब्बल ५० टन कचरा येथे अडकला. महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून बंधारा परिसर प्लास्टिकमुक्त केला. शहरातही सहा टन कचरा वाहून येऊन ठिकठिकाणी अडकला. गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या सर्व विभागांचे सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा लावून हा कचरा काढला. त्यामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा होऊन रस्ते रिकामे होऊन वाहतूक सुरळीत झाली.

राजाराम बंधारा येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा झाल्याचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने नागरिकांचीही येथे गर्दी झाली होती. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, (bottles)मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सकाळी आठ वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. महापालिकेच्या यंत्रणेने एक जेसीबी, एक ट्रॅक्टर, एक डंपर, नऊ कर्मचाऱ्यांमार्फत ५० टन प्लास्टिक कचरा काढला. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल, प्लास्टिक, लाकडाचे ओंडके व इतर कचरा होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहिली.

आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणा पाऊस गुरुवारी तासभर शहरात कोसळला. प्रमुख चौक, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहनधारकांना कसरत करतच जावे लागले. नाले सफाई करूनही कचरा वाहून येऊन ठिकठिकाणी अडकल्याने हे पाणी तुंबल्याचे स्पष्ट झाले. (bottles)खानविलकर पंप पुलावर, जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसर, पाटील वाडा हॉटेल, वेटोळे मळा झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प, सावित्रीबाई फुले रुग्णालय चौक, रेणुका देवी मंदिर चौक, तपोवन म्हाडा कॉलनी.

सरनाईक कॉलनी, श्याम सोसायटी नाला पंप हाऊस चौक, आनंद प्राईड अपार्टमेंट आयटीआयच्या पाठीमागे, गणेश कॉलनी आयटीआयच्या पाठीमागे, तपोवन परिसरातील सखल भाग, परीख पूल, प्रतिभानगर हॉलच्या पाठीमागे, राजारामपुरी मेन चौक, राजारामपुरी बारावी गल्ली आदी ठिकाणी कचरा अडकल्याने पाणी तुंबून वाहतूक कोंडी झाली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरामध्ये सखल भागातील गाळ व प्लास्‍टिक उठाव करण्याची मोहीमही सकाळपासून सुरू राहिली.
महापालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीत प्लास्टिकच्या कचऱ्यामुळेच शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले. हा कचरा महापालिकेच्या यंत्रणेमार्फत काढून पाण्याचा निचरा केला.

हेही वाचा :