आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(political) यांनी केलीयं. मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री (political)फडणवीस म्हणाले, आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काही काळजी करु नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली असून आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महायुतीच्या कार्यकाळात या महामार्गाचं उद्घाटन होत असल्याचा आम्हाला आनंद. आता असा शक्तीपीट महामार्ग आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा असून हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदलणारा, अर्थिक बदल घडवणारा आहे, त्यामुळे त्याचं कामही लवकरच सुरु होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
महायुतीची गाडी एकदम सुसाट!
ही गाडी आम्ही तिघेही महाराष्ट्राच्या विकासपथावर चालवत आहोत…(इगतपुरी, नाशिक | 5-6-2025)@mieknathshinde @AjitPawarSpeaks #Maharashtra #Nashik #SamruddhiMahamarg pic.twitter.com/wtqU0uAY5m
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2025
दरम्यान, मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांतच पार करता येण्यासाठी एमएसआरडीसीने 701 किलोमीटर लांबीचा 55 हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता. राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुक्यासह 392 गावांमधून जाणाऱ्या या सहा पदरी महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच नागपूर-शिर्डी दरम्यानच्या 520 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर शिर्डी ते भरवीर 80 किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं.
हेही वाचा :