विमान अपघाताचे कारण ब्लॅक बॉक्स मधून मिळणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इंग्लंडला जाण्यासाठी टेक ऑफ घेतलेले एअर इंडियाचे विमान मेघानी नगर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या इमारतीवर कोसळले. या अपघातात(plane crash) मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेली असून गुरुवारी उशिरापर्यंत मृतांचा नेमका आकडा अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नव्हता. एखादे विमान नागरी वस्तीवर कोसळते तेव्हा त्याची भीषणता अगदी जवळून पहावयाला मिळते. विमानाची दोन्ही इंजिन्स अचानक बंद पडली आणि त्यामुळेच एअर इंडियाचे हे विमान 700 फूट उंचीवरून खाली कोसळले अशी प्राथमिक माहिती पुढे खाली आहे. या विमानातील ब्लॅक बॉक्स हाती लागल्यानंतरच हा अपघात नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे. या अपघाताची कारणे समजण्यास काही अवधी लागणार आहे.

मध्ये कुठेही न थांबता एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद येथून थेट लंडनला जाणार होते. सुमारे आठ ते नऊ तासांचा हा प्रवास असल्यामुळे विमानाची(plane crash) इंधन टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली होती. विमानात पायलट, क्रू मेंबर्स, यांच्यासह 242 प्रवासी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा सुद्धा या प्रवाशांमध्ये समावेश होता. विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान 700 फूट उंचीवरून खाली कोसळले. खाली कोसळतात इंधन टाकीचा स्फोट झाला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसती गृह असलेल्या इमारतीवर हे विमान कोसळलं. त्यामुळे या इमारतीत असलेले काही जण मृत्युमुखी पडले असल्याचे सांगण्यात येते आहे. एकूणच या भीषण अपघातातील मृतांचा आकडा हा मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायलटने विमानतळावरील(plane crash) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. इमारतीवर विमान कोसळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर अनेकांना 2001 मध्ये न्यूयॉर्क येथील व्यापारी इमारतीवर झालेल्या 9/11 च्या आतंकी हल्ल्याच्या भीषणतेची याद आली. इंडियन एअरलाइन्सच्या ए आय 171 या विमानाचा अपघात हा इंजिन मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडातून झाला आहे. वास्तविक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी टेक ऑफ घेण्यापूर्वी विमानाची अतिशय बारकाईने तपासणी केली जाते. ही तपासणी तज्ञ अधिकाऱ्यांकडून केली जाते.

त्यांच्या एनओसी नंतरच विमान प्रवासाला जाण्यासाठी सज्ज होते. याचा अर्थ या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचीही (plane crash)तपासणी केली गेली असणार. उड्डाणासाठी विमान तंदुरुस्त आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच विमान टेकऑफ ची परवानगी दिली जाते. या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार ते पाच मिनिटात त्याच्यात दोन्ही इंजिन मध्ये मोठा बिघाड असल्याचे पायलटच्या अर्थात वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली पण खूप उशीर झाला होता. अवघ्या काही क्षणात हे विमान खाली कोसळले होते. विमानाने टेक ऑफ घेण्यापूर्वी या विमानाच्या इंजिनची तपासणी केली असेल तर मग अवघ्या काही मिनिटात इंजिनमध्ये बिघाड कसा काय होऊ शकतो हा प्रश्न उपस्थित होतो.


खराब हवामान, इंजिनमध्ये बिघाड, हवेत पक्षांनी दिलेली धडक अशा काही कारणामुळे विमाने कोसळतात(plane crash). गेल्याच वर्षी मुंबईच्या काही परिसरात 37 रोहित पक्षी छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले आढळले होते. हे रोहित पक्षी हवेत विमानाला धडकल्यामुळे मृत्युमुखी पडले असल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले. दोन अडीच वर्षांपूर्वी एक छोटे विमान मुंबईतील एका इमारतीवर कोसळून त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. दिनांक सात ऑगस्ट 2020 मध्ये कोझीकोडे येथे विमान कोसळून त्याचे तीन तुकडे झाले होते आणि 17 प्रवासी ठार झाले होते. 22 मे 2010 मध्ये खराब हवामानामुळे मेंगलोर येथे विमान अपघात होऊन 158 प्रवासी ठरणारे होते. 17 जुलै 2000 मध्ये पाटणा येथे विमान लँड होताना ते नागरी वस्तीवर कोसळून छप्पन प्रवासी ठार झाले होते.

12 नोव्हेंबर 1996 मध्ये हरियाणा परिसरात सौदी आणि कजाकिस्तान एअरलाइन्सशी दोन विमाने हवेत एकमेकाला धडकली होती. त्यामध्ये 349 प्रवासी ठार झाले होते. अहमदाबाद विमानतळावर(plane crash) अशाच प्रकारचा अपघात होऊन 130 प्रवासी ठार झाले होते. काही वर्षांपूर्वी 26 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर विमानतळाच्या रनवेवर एक विमान ट्रक ला धडकून झालेल्या भागात पंचांग प्रवासी ठार झाले होते. धावपट्टीवरून धावताना भरकटत गेलेले विमान, खराब हवामानामुळे जंगल भागात कोसळलेले विमान, पक्षांच्या धडकेमुळे झालेला विमान अपघात, वैमानिकाच्या चुकीमुळे झालेल्या विमान अपघात असे अनेक अपघात यापूर्वी झालेले आहेत.

विमान प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेली वाढ, विमानाने प्रवास करणाऱ्या ंच्या संख्येत झालेली वाढ, त्यामुळे अवकाशातही विमानांची गर्दी झालेली दिसते. विमानांची देखभाल पुरेशा गांभीर्याने केली जात नाही. इंजिन देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. विमानामधील काही इलेक्ट्रिकल वायर्स उंदरांनी कुरतडलेल्या घटना विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी लक्षात आल्याने दुर्घटना टळलेल्या आहेत. अहमदाबाद येथील मेघानी नगर नागरी वस्तीमध्ये कोसळलेल्या विमान अपघाता विषयी ब्लॅक बॉक्स उपलब्ध झाल्यानंतर नेमकी कारणे पुढे येतील. ह्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत कुणी एखादाजिवंत राहिला असेल तर ते एक आश्चर्य म्हणावे लागेल. बहुतांशी प्रवाशांचा विमानातच होरपळून मृत्यू झालेला आहे अशी माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा :