लेक ओढ्याच्या पाण्यात पडला, वाचवण्यासाठी आईने उडी मारली अन्…;

यवत : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहू नजिक देवकरवाडी येथे वाहत्या पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवायला जाऊन आईने पाण्यात(water) उडी मारल्यामुळे दोघा माय- लेकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निर्मला अनिल दरेकर( वय ३२) आणि मुलगा हर्षद अनिल दरेकर ( वय ११ वर्ष) हे मयत झाले आहेत.

रविवार २७ जुलै रोजी दौंड तालुक्यातील देकरवाडी गणेशनगर येथील शेतात निर्मला ऊस खुरपण्यासाठी गेल्या होत्या. रविवार सुट्टी असल्याने मुलगा हर्षद हा बरोबर आलेला होता. दुपारच्या वेळी तो खेळता- खेळता शेतात कडेच्या ओढ्याच्या पाण्यात पाय घसरुन पडला. हे पाहताच निर्मला यांनी त्यला वाचवण्यासाठी आरडाओरडा करीत पाण्यात उडी घेतली. परतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आई व मुलगा दोघांचाही पाण्यात(water) बुडुन मृत्यू झाला. दरम्यान काही वेळानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मयत झालेल्या माय लेकराला पाण्याबाहेर काढले.

दरम्यान यावेळी हर्षद याचे वडील अनिल सोपान दरेकर हे हर्षद याची सायकल दुरुस्त करण्यासाठी खामगाव येथे गेले होते. यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या मायलेकराला त्वरीत उपचारासाठी यवत ग्रामीण रूग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सांयकाळी आई आणि मुलावर एकत्र अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अनिल दरेकर यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवकरवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे .

हेही वाचा :

दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे ३० जुलै रोजी उदघाटन;
चहा बिस्किटसोबत खाण्याची सवय आहे? मग हे वाचाच, नाहीतर शरीर आतून होईल पोकळ!

कहाणी एका “महादेवी” ची! भारतीय वन्य जीव कायद्याची