लोकल अपघात टाळण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!

मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवार, ९ जून २०२५ रोजी घडलेल्या भीषण (passengers )अपघातामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धावत्या लोकलमधून काही प्रवासी खाली कोसळले, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करणे आणि टप्प्याटप्प्याने सर्व लोकल एसी करणे, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला ‘अतिशय गंभीर’ म्हटले आहे. ते म्हणाले, “कालची घटना अतिशय गंभीर आहे. काल रेल्वेमंत्री माझ्यासोबत पाऊण तास चर्चा करत होते. अडचणी नेमक्या काय आहेत, हे त्यांनी समजवून सांगितले. तसेच, उपाययोजना काय आहेत, या सुद्धा त्यांनी सांगितल्या.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, (passengers )उपनगरीय रेल्वेवर सर्वाधिक गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. तरीही, कालची घटना गंभीरच आहे.

आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्याने अजूनही उपनगरीय रेल्वेवर प्रवाशांची गर्दी मोठी आहे. त्यामुळे, ‘ट्रेनची संख्या कशी वाढवता येईल,’ हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलला दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. यावर काही जणांनी ‘प्रवासी गुदमरले जातील’ अशी भीती व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “इतकं सरकारला समजतं की, जर दरवाजे लावले, तर व्हेंटिलेशनची सुविधा सुद्धा करावी लागेल.”

याशिवाय, मुंबईत मोठ्या प्रमाणात एसी ट्रेन देण्याचा सरकारचा विचार आहे. “भाडेवाढ न करता एसी ट्रेन देण्याचा विचार सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तसा प्लान तयार केला आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. “कालची जी घटना आहे, त्यातून निश्चितच आपल्याला काही शिकावं लागेल.(passengers ) त्यापद्धतीने तसं काम करावं लागेल आणि ते काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल.” मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आपल्या मेट्रो या एसी आहेत आणि लोकल ट्रेन… म्हणजे लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा प्रवासी हा दुय्यम नाहीये ना? म्हणून त्यांनाही एसी ट्रेन मिळावी, असा आमचा आग्रह आहे.”

कार्यालयाच्या वेळेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आपण आपल्या शासकीय कार्यालयांना काही ‘फ्लेक्झिबल टाईम’ दिलेलाच आहे. तो यापूर्वीच दिलेला आहे.” खाजगी कार्यालयांना तो करणे थोडे कठीण जात आहे, कारण त्यांचे प्रॉफिट्स आणि इतर गोष्टींचा ते विचार करतात. पण यामध्ये अजून काही करता येईल का, हा निश्चितच आपला प्रयत्न असणार आहे. “दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून कसं वाढवता येईल, हा आमचा प्रयत्न असणार आहे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :