रवींद्र जडेजाला CSK च्या कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं होतं? 3 वर्षांनी जडेजाने केला खुलासा

चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींपैकी एक आहे. आतापर्यंत 5 वेळा या संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली असून या सर्व ट्रॉफी त्यांनी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात पटकावल्या आहेत. आतापर्यंत 2 वेळा चेन्नई सुपरकिंग्सने धोनी वगळता संघाचं नेतृत्व नव्या शिलेदारांच्या खांद्यावर दिलं होतं मात्र ते दोन्ही कर्णधार(Ravindra Jadeja) त्यांच्या कारकिर्दीत चेन्नईला चांगलं यश मिळवून देऊ शकले नाहीत.

आयपीएल 2022 मध्ये सीएसकेने रवींद्र जडेजाकडे(Ravindra Jadeja) संघाचं नेतृत्व सोपवलं होतं, परंतु चालू सीजनमध्येच जडेजाला कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि पुन्हा धोनीकडे नेतृत्व देण्यात आलं. परंतू 3 वर्षांपूर्वी जडेजाला ऐन आयपीएल सीजन सुरु असताना सीएसकेने कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं याविषयीचा खुलासा जडेजाने एका मुलाखतीत केला आहे.

रविचंद्रन अश्विनने रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja)मुलाखत घेतली. यावेळी जडेजाला आयपीएल, भारतीय संघ आगामी टेस्ट सीरिज इत्यादी बाबत प्रश्न विचारण्यात आले. रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. या सीजनमध्ये सीएसकेची सुरुवात खराब झाली सुरुवातीचे 4 सामने त्यांनी गमावले होते.

त्यानंतर सीजनचे 8 लीग स्टेज सामने झाल्यावर जडेजाला कर्णधार पदावरून हटवण्यात आलं आणि पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवलं. त्यावेळी चेन्नई सुपरकिंग्सने पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर समाप्त केलं होतं. जडेजाला ऐन सीजनमधून कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आल्याने जडेजा आणि फ्रेंचायझीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. यासोबतच जडेजा सीएसके सोबत असलेला करार रद्द करुन ऑक्शनमध्ये येईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं, मात्र तसं झालं नाही आणि जडेजा सीएसके सोबतच राहिला.

रवींद्र जडेजाला CSK च्या कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं होतं? याविषयी बोलताना जडेजा म्हणाला की, ‘ते कठीण होतं. टी 20 क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल ही एक घटना असते. हा एक फास्ट खेळ आहे, पण माझ्यासाठी हा एक अनुभव होता. मी चांगलं करू शकत होतो.

एक कर्णधार म्हणून जर तुमचा संघ चांगला नसेल तर सगळा दोष हा कर्णधारावर येतो. परंतु जेव्हा तुमचे फलंदाज आणि गोलंदाज चांगला परफॉर्मन्स करून साथ देत नाहीत तेव्हा टी 20 फॉरमॅटमध्ये जिंकणं अवघड असतं.

अश्विनच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत जडेजा पुढे म्हणाला की, ‘मला वाटतं की मी चांगलं करू शकलो असतो, किंवा काहीतरी वेगळं करू शकलो असतो. काही दिवस मी यावर विचार केला परंतु मग मला जाणीव झाली की जर तुमचे फलंदाज आणि गोलंदाज योगदान देत नसतील तर सर्वकाही नकारात्मक वाटायला लागतं. जर तुम्ही चांगले प्रदर्शन करता तर सगळं काही चांगलं वाटतं. टी 20 फॉरमॅटमध्ये फलंदाजीचा क्रम बदलावा लागतो’.

हेही वाचा :

64MP कॅमेरा आणि AI फीचर्ससह स्वस्त 5G फोन लाँच

काजोल करणार राक्षसाशी सामना; ‘Maa’ चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर रिलीज

शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार – निकाल तयार असूनही विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला