मानवी नातेसंबंध हे अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचे असतात. कोणत्याही नात्यामध्ये आदर,(habits ) समजूतदारपणा, संयम आणि प्रामाणिकपणा हे घटक अत्यंत आवश्यक असतात. स्त्रियांना एखाद्या पुरुषामध्ये काय भावते, हे सांगणे तसे कठीण आहे, पण चाणक्य नीतीमध्ये याचे स्पष्ट उल्लेख सापडतात. आचार्य चाणक्य हे केवळ राजकारणाचे जाणकार नव्हते, तर मानवी स्वभावाचेही ते अचूक अभ्यासक होते. त्यांनी आपल्या नीतीशास्त्रात स्त्रियांना प्रभावीत करणाऱ्या पुरुषांच्या पाच गुणांचा उल्लेख एका श्लोकात केला आहे, जे त्यांना आकर्षित करतात आणि नातेसंबंध दृढ करतात.
हा श्लोक आहे – ‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघृष्णच्छेदनतपद्नैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।’ या श्लोकानुसार, स्त्रिया केवळ पुरुषाच्या दिसण्यावर भाळत नाहीत, तर त्यांच्या विचार, वागणूक, प्रामाणिकता आणि नात्यातील समजूतदारपणावर भाळतात. पुरुषांच्या काही विशिष्ट सवयी स्त्रियांच्या दृष्टीने त्याला ‘हिरो’ बनवतात, आणि त्याच्याशी नाते जोडणे हे त्यांच्या दृष्टीने सन्मानास्पद ठरते.
१. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता:
कोणत्याही नात्याची खरी ताकद ही विश्वासात असते, आणि तो निर्माण होतो तो प्रामाणिकपणामुळे. चाणक्य स्पष्टपणे सांगतात की, स्त्रियांना अशा पुरुषांबद्दल प्रेम वाटते जे नात्यामध्ये पूर्णपणे इमानदार असतात. अशा पुरुषांमध्ये काहीही लपवाछपवी नसते आणि ते आपली चूकही प्रामाणिकपणे मान्य करतात. महिलांना सहसा पुरुषांवर शंका घेण्याची सवय असते, पण जेव्हा पुरुष मनापासून प्रामाणिक असतो, तेव्हा त्या त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे इमानदारी ही फक्त सवय नाही, तर एक नाते टिकवून ठेवणारी अमूल्य शक्ती आहे, जी नात्याला बळकटी देते.
२. सज्जनपणा आणि सौम्यता:
सज्जनपणा आणि सौम्यता हे पुरुषांमधील असे गुण आहेत जे कोणत्याही स्त्रीला सहज आकर्षित करतात. चांगली वागणूक म्हणजे केवळ बोलण्याच्या स्वरात नम्रता असणे नव्हे, तर समोरच्याच्या भावनांची जाणीव ठेवणे. जो पुरुष स्त्रीशी तसेच इतर लोकांशी आदराने बोलतो, त्यांच्या मतांना किंमत देतो,(habits ) तो स्त्रियांना आपलासा वाटतो. याउलट, टोमणे मारणारे, सतत कुरकुर करणारे पुरुष त्यांना मानसिक थकवा देतात आणि त्यांना दूर लोटतात. स्त्रीला फक्त एक गोष्ट हवी असते – आपुलकीने वागणारा, प्रेमळ आणि समजूतदार जोडीदार.
३. चांगला श्रोता असणे:
अनेक पुरुष बोलण्यात पटाईत असतात, पण ऐकणे फारच थोड्यांना जमते. चाणक्य सांगतात की, चांगला श्रोता असलेला पुरुष हा स्त्रीच्या मनाजवळचा होतो. स्त्रियांना त्यांच्या मनातले बोलायचे असते, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसकट. त्या वाट पाहत असतात की कोणीतरी त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष न करता शांतपणे ऐकावे. जेव्हा एखादा पुरुष तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतो, तिच्या भावनांना महत्त्व देतो आणि वेळोवेळी तिचे कौतुक करतो, तेव्हा ती त्याला आपल्या आयुष्यातील ‘खास व्यक्ती’ मानते.
४. आत्मसन्मानाची जपणूक:
चाणक्य नीतीमध्ये एक स्पष्ट संदेश आहे: जो पुरुष स्त्रीच्या आत्मसन्मानाची जपणूक करतो,(habits ) त्याचा ती खऱ्या अर्थाने आदर देते. नात्यांमध्ये थट्टा करणे, उपहास करणे, लहान-मोठे बोलणे हे हळूहळू नाते तुटण्याची कारणे ठरतात. स्त्रीचे मन अतिशय नाजूक असते, जिथे तिला अपमानाची छाया सुद्धा जाणवते, तिथे ती मागे हटते. म्हणूनच, जो पुरुष तिच्या मतांचा आदर करतो, तिला स्वतंत्र निर्णय घेऊ देतो आणि तिच्या मर्यादा समजून घेतो, तोच तिच्या आयुष्यात टिकतो आणि तिला सुरक्षित वाटतो.
चाणक्य म्हणतात की, जो पुरुष आपल्या चुका सहजपणे स्वीकारतो, त्याचा अहंकार त्याच्या प्रेमाच्या आड येत नाही. स्त्रियांना अशा पुरुषांची किंमत वाटते, जे आपले म्हणणे थोपवून न धरता, आवश्यक तेव्हा माफी मागण्याची किमान नम्रता ठेवतात. गर्विष्ठपणा, वर्चस्व गाजवण्याची सवय आणि ‘नेहमी आपणच बरोबर’ असा दृष्टिकोन नात्याला मारक ठरतो. जो पुरुष संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर करतो आणि मनमोकळेपणाने नाते सांभाळतो, त्यालाच स्त्री आपल्या जीवनाचा खरा साथीदार मानते, आणि अशा नात्यात सुसंवाद कायम राहतो.
हेही वाचा :