मावळात मोठी दुर्घटना घडली आहे. काल दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल(bridge) कोसळल्याने अनेक पर्यटक बुडाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. तर 52 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालंय. या दुर्घटनेमध्ये योगेश आणि शिल्पा भंडारे या जोडप्याचा जीव वाचला आहे. योगेश खराडीला राहत असून बॅंकेत काम करतात. रविवारी ते पत्नीसोबत कुंडमेळ्याला फिरायला आले होते. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांनी दुर्घटनेचा थरार सांगितला आहे.

कुंडमळा पूल(bridge)जेव्हा इंद्रायणी नदीमध्ये कोसळला. तेव्हा योगेश आणि त्यांची पत्नी पूलाच्या मध्यभागी होते. मी मृत्यू डोळ्यांदेखत पाहिला. पूल कोसळला, तेव्हा पुलाच्या मध्यभागी होतो. तिघाजणांचा मृत्यू मी जवळून पाहिला आहे. घाई करू नका, जावू नका असं लोक सांगत होते. परंतु कोणीच ऐकलं नाही अन् हे सगळं घडलं असंही योगेश यांनी म्हटलं आहे.
एनडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाने रात्रीपर्यंत बचावकार्य सुरु ठेवले होते. अंधार आणि पावसामुळे रात्री बचावकार्य थांबण्यात आलं. तर आज सकाळपासून पुन्हा एकदा या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे बचावकार्याला मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
प्रशासनाला पूलावरून नदीत नेमके किती जण वाहून गेले, याची माहिती अद्याप स्पष्ट नाही. आज (16 जून) सकाळी प्रांताधिकारी व तहसीलदार कुंडमळा येथे पोहोचून चौकशी केली. अद्याप कोणाची बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त नाही, पण खबरदारी म्हणून शोध मोहीम सुरू केली जाईल. पूल रहदारीसाठी बंद असताना पर्यटक तिथे गेले.

तर घटनेची चौकशी सुरु असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले. प्रशासनाला अद्याप बेपत्ता व्यक्तींबाबत तंतोतंत आकडा उपलब्ध नाही. आणखी 2 ते 3 जण बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात एनडीआरएफच्या पथकाने अधिक सखोल शोध मोहीम राबवण्याचे आदेश मिळाले आहेत.
हेही वाचा :
NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी संधी – Aditya Tutorials कडून प्रवेश प्रक्रिया सुरू
महापालिका रणधुमाळीला प्रारंभ : सुरेश हाळवणकर यांच्याकडून भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू
इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न