शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरुन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून सरकारदरबारी त्यांना न्यायाची अपेक्षा (demands )आहे.
दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून ही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केलं जात आहे(demands ). नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोन वर बोलणं करून दिलं.
यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा वडीलकीचा सल्ला दिलाय. अशातच राज्यातील इतर नेते देखील आज कडूंच्याआंदोलन स्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊ.
बेमुदत अन्नत्याग उपोषणाचा आजचा चौथा दिवस, प्रमुख मागण्या नेमक्या काय?
1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.
2. दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावे.
3. आपत्कालीन संकटमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे.
4. दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे(demands ).
5. वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे.
6. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1000/- मजुरी दिली जावी.
9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.
10. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.
11. 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे.
12. शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.
13. शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे.
14. शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे.
15. शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा(demands ).
16. शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी.
17. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.
हेही वाचा :