सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? अचानक नेमकं काय घडलं?

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.( Pawar’s)काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या आमदारांमध्ये नाराजीचं वृत्त हाती आलं आहे. येत्या 22 जुलै रोजी दिवंगत अजित पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने आमदारांना महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या सूचनेवरून आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दिवंगत नेते अजित पवार यांची सर्व शासकीय कार्यालयात केली जाणार आहे. कारण( Pawar’s) अजित पवार यांचा थोरपुरुष आणि थोर व्यतींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाने 15 जुलै 2026 जुलै रोजी अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. या जयंतीनिमित्त अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. बॅनर लावल्यानंतर त्याचं जियो टॅगिग करण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाच्या निर्णयावर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुले पक्षातील नेत्यांचा आमदारांवर विश्वास नाही का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीत अचानक नेमकं काय घडलं?
दिवंगत नेते अजित पवार यांची येत्या 22 जुलै रोजी शासकीय पातळीवर( Pawar’s) जयंती साजरी केली जाणार असल्याचे समोर आलं आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेक बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदारांना अजित पवारांची जयंती राज्यभर साजरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जयंतीनिमित्त अनेक उपक्रम देखील घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अजितदादांचे जयंतीनिमित्त एकाच प्रकारचे फोटो वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बॅनरसहित जियो टॅगिग करण्याचेही आदेश दिलेत. यावरून सुनेत्रा पवारांच्या आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नाराजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

हेही वाचा :

इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही?

सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही?

आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी?