सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील(political updates) यांनी नुकताच ठाकरे गटाला राम राम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यावर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचया पक्षातूनही चंद्राहार पाटील या यांच्यावर टीकेचा वर्षाव होऊ लागला आहे. त्याचवेळी सांगली लोकसभा मतदारंसघाची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना देण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे संजय राऊत यांनादेखील आता टीकेचा सामना करावा लागत आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली मतदारसंघाची मागणी केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चंद्रहार पाटील यांनी पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही देण्यात आली. पण पाटील यांच्या उमेदवारीला अनेकांचा विरोधही होता. तरीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मोठ्या आग्रहाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. पण निवडणुकीत पाटील यांचा पराभव तर झालाच पण त्यांचे डिपॉझिटही जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या वर्षभरातच चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता पक्षातूनच संजय राऊतांवर टीका होऊ लागली आहे.
मीरजमध्ये झालेल्या सभेत चंद्रहार पाटील(political updates) यांनी उद्धव ठाकरेंना जुनी चांदीची गदा पॉलिश करून दिली आणि उद्धव ठाकरे त्याच गदेला भाळले. पण आतातरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचे न ऐकता लोकांमध्ये यावे, वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशा शब्दांत जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी टोला लगावला आहे. चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत यांन सांगतील शिवसेनेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ज्या चंद्रहारसाठी संजय राऊत यांनी अट्टहास केला, त्याच चंद्रहारांनी आज पक्ष सोडला. त्यामुळे संजय राऊतांनी सर्वांची जाहीर मागावी, अशी विनंतीही दिगंबर जाधव यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला आपल्यासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी विरोध केला होता. पण या झाले देव जाणे हा पैलवान ७० हजारांहून अधिक मते घेऊच शकत नाही, असे सांगूनही कोणीच आमचे ऐकले नाही. संजय राऊत चार दिवस सांगलीत त्यासाठी तळ ठोकून बसले होते. यामागचा सुत्रधार कोण होता, हेही आज लपून राहिलेले नाही. पण पाटलांच्य पराभवामुळे पक्षाची मात्र नाचक्की झाली. नुकसान झाले, चंद्रहार पाटलांकडे नेमकं आहे तरी काय, एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेला पैलवान आता तालीम बांधत आहे. पण त्या नावावर किती वाळू,खडी उपसली हे मोजायलाच पाहिजे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
वंचितच्या वाटेवर असलेले, भाजप, काँग्रेस(political updates) आणि राष्ट्रवादीच्या दारात वारंवार जाऊन दमछाक केलेले हेच नेते आता ठाकरे गटाकडे वळले, यामागचं नेमकं कारण शोधण्याची गरज आहे. मात्र संजय राऊत यांनी या प्रकरणात जी चूक केली, त्याबाबत त्यांना माफी मागावीच लागेल, असं ठाम मत दिगंबर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना भेटीसाठी बोलावले होते. त्याच बैठकीसाठी संजय राऊत हे चंद्रहार यांना देखील बोलवत होते. मात्र विशाल पाटील यांनी स्पष्ट नकार देत चंद्रहारला हटवलं. ‘चंद्रहारचा या विषयाशी काय संबंध?’ असा प्रतिप्रश्न विशाल पाटील यांनी केला होता, असा गौप्यस्फोटही दिगंबर जाधव यांनी केला.
हेही वाचा :