‘चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?’ राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोन्याची खरेदी कमी करण्यासह पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचं आवाहन केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधानांना खुले पत्र लिहून सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशवासियांना काटकसरीचं आवाहन करत सोनं खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, परदेश दौरे मर्यादित ठेवा आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, असे सल्ले दिले. (political) त्यांच्या या आवाहनानंतर विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांनी मोदींना पत्र लिहून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं की, देश आणि राज्यांची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असताना सरकार याबाबत स्पष्ट बोलत नाही. कच्च्या तेलाच्या किंमती पूर्वी कमी असतानाही नागरिकांकडून महाग दराने पेट्रोल-डिझेलचे पैसे घेतले गेले, मग त्या लाखो कोटी रुपयांचं काय झालं, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर टीका करत राज ठाकरे म्हणाले की, एकीकडे सामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला जातो, तर दुसरीकडे सत्ताधारी नेते मोठमोठ्या ताफ्यांसह प्रचार दौरे आणि मिरवणुका काढतात. अशा परिस्थितीत जनतेवरच काटकसरीची जबाबदारी का टाकली जाते, असा प्रश्न त्यांनी विचारला.राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख केला. (political) अशा योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढल्याचं सांगत, निवडणुका जिंकण्यासाठी ‘रेवड्या’ वाटण्याची संस्कृती थांबवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

तसंच पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. लोकांना परदेश प्रवास टाळण्याचा सल्ला देण्याआधी स्वतःचे परदेश दौरे थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने स्वतःपासून काटकसर सुरू केली, (political) तर देशही त्याचं पालन करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना आवाहन करत म्हटलं की, अर्थव्यवस्थेची खरी स्थिती जनतेसमोर मांडावी, संसदेत चर्चा घडवून आणावी आणि सरकारने नेमकी कोणती पावलं उचलणार आहे, हे स्पष्ट करावं.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?