ठरलं तर मग या मालिकेच्या 21 जुलै 2025 च्या एपिसोडमध्ये अर्जुन (series)चैतन्याची वाट पाहत असतो. तो साक्षीच्या दुसऱ्या मोबाईल फोनच्या रेकॉर्डची चौकशी करायला गेलेला असतो. चैतन्य आल्यावर त्याला समजतं की आश्रमात विलास, मधु भाऊ, प्रिया यांच्या व्यतिरिक्त आणखी एक फोन ऑन होता. याचाच अर्थ साक्षीचा एक फोन आश्रमाच्या बाहेर बंद पडला आणि एक फोन आश्रमात चालू होता. हा पुरावा केसला खूप पुढे घेऊन जाणार याची अर्जुनला खात्री असते.

तर दुसरीकडे अर्जुनच्या हाती साक्षीच्या दुसऱ्या फोनचे लोकेशन लागल्यामुळे दामिनी वेगळा प्लॅन करते. ती साक्षीला सतत पढवते की काही झालं तरी तुला आता कोर्टामध्ये खरं सांगायचं आहे. (series)त्या रात्री तू आश्रमात होतीस हे कबूल करून टाक. आपण जर हे कबूल केलं तर आपण फसू अशी भीती साक्षीला वाटते. महिपत सुद्धा म्हणतो की गेली दोन वर्ष माझी मुलगी घसा ओरडून सांगते की त्या आश्रमात ती गेली नव्हती तरीही तुम्ही आता असं तिला का करायला सांगता?
यावर दामिनी म्हणते की त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर का उद्या अर्जुनने कोर्टात सिद्ध केलं की साक्षीकडे दुसरा फोन होता आणि ती तिथेच होती तर आपण खोटं ठरु. त्यापेक्षा आधी तिने स्वतःहून (series)कबूल केलं तर फार फार तर तिला दंड भरावा लागेल. जो की तुम्ही आधीही भरला आहेत. पण जर ती असं बोलली नाही आणि अर्जुन ने ते सिद्ध केलं तर ती जन्मठेपेच्या जवळ पोहोचेल. काय करावे साक्षी आणि महिपतला सुचत नसतं.
Tharla Tar Mag मध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी बसले असताना प्रिया मुद्दाम घरच्यांचे कान भरायचं काम करत असते. जे अर्जुन आणि सायली ऐकतात. प्रिया मुद्दाम बोलते की या केसमुळे आपल्या घरातल्यांना किती मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकदा का अर्जुन ही केस हरला की आपण सगळेच सुटू. अर्जुन हरावा असं प्रिया का बोलते हे कोणाला समजत नाही. तेव्हा अर्जुन आणि सायली पुढे येऊन तिला तंबी देतात. ज्यांना केस हरण्याची भीती असते तेच असं काहीतरी बरळतात. माझं प्रोफेशन असा आहे की पत्रकार वगैरे सगळे मध्ये येणारच. आणि आता या केसचे काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे तुम्हाला याचा त्रास होणार नाही. महिपतच्या खोबऱ्यांना सुद्धा हे कळू देत. अर्जुन आपल्याला टोमणे मारतोय हे प्रियाला समजलेलं असतं.
ठरलं तर मग मध्ये केस ला सुरुवात झालेली असते. दामिनीने साक्षीला आश्रमात असल्याची कबुली द्यायला सांगितलेलं असतं. अर्जुन जेव्हा सुनावणीसाठी उभा राहतो तेव्हा तो तिला पुन्हा एकदा विचारतो की तू आश्रमात होतीस का. दामिनीला वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे साक्षी कबूल करेल पण ऐनवेळेला साक्षी माघार घेते. ती खरं कबूल करत नाही. ती पुन्हा एकदा खोटं सांगते की मी आश्रमात गेली नव्हती. साक्षी असं बोलल्यामुळे दामिनी चांगलीच तोंडावर आपटते. तिने जो काही प्लॅन केलेला असतो तो पुढे तिला करता येत नाही. साक्षी मुळे आपण हरणार हे तिला तोंडावर दिसू लागतं.
हेही वाचा :
आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
घरकाम, करिअर आणि शिक्षण… AI आपल्या जीवनाला कसं सोपं करतंय?
‘उत्कृष्ट मत्स्य पालन’चा सुजाता जाधव यांना पुरस्कार; पुणे विभागात तारळेकरांचा डंका