गुंतवणूकदारांचे पैसे वेळेत देऊ न शकल्यामुळे विषारी औषध प्राशन करून (trouble)आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील एका भाजप नेत्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वच गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. कोल्हापुरातील फुलेवाडी उपनगरात ही घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फुलेवाडी ता. करवीर येथील प्रमिलाराजे खानविलकर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खासगी भिशी योजनेत गुंतवणूकदारांचे तब्बल आठ कोटी रुपये अडकले आहेत. या आर्थिक तणावामुळे भिशी चालक आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी गुरुवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सध्या त्यांच्यावर लक्ष्मीपुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार (trouble)सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरासह कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.वाढत्या तगाद्याने मानसिक ताण राजू मोरे हे गेल्या काही वर्षांपासून प्रमिलाराजे खानविलकर पतसंस्थेच्या नावाने खाजगी भिशी योजना चालवत होते. दरवर्षी 24 टक्के व्याजदराचे आमिष दाखवून त्यांनी फुलेवाडीसह परिसरातील नागरिक, महिला आणि शासकीय सेवकांकडून गुंतवणूक गोळा केली होती. सुरुवातीला काही सभासदांना टक्क्यांनुसार परतावा देण्यात आला. दरवर्षी दिवाळीत भिशी फुटते.
मात्र यावर्षी काही खातेदारांनी पतसंस्थेतील घेतलेली कर्जाची रक्कम (trouble)परत न केल्यामुळे भिशी अडचणीत आली. त्यामुळे सभासदांना पैशांचा परतावा देणे मोरे यांच्यासाठी अशक्य बनले. प्रयत्न करुन यंदा दिवाळीच्या सुमारास सभासदांना काही रक्कम देण्यात आली होती; मात्र उर्वरित गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा सततचा तगादा वाढत गेला.गुरुवारी भिशी फुटणार आणि गुंतवणूकदारांनी पतसंस्था कार्यालयाजवळ यावे, अशी माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी पासूनच पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर सुमारे दोनशेहून अधिक नागरिक आणि महिला सभासद जमले होते.

भिशी फुटणार असल्याच्या अफवांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.(trouble) तगादा आणि तणाव वाढत चालल्याने मोरे यांनी शेवटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची खबर पोलिसांना मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनेची पुष्टी केली आहे.संबंधित पतसंस्थेचे खाते आणि व्यवहार चौकशीअंती गुंतागुंतीचे दिसत असून काही कोटी रुपयांचा निधी बेळगाव परिसरातील खासगी व्यवहारांमध्ये गुंतविण्यात आला असल्याची प्राथमिक माहितीदेखील तपासात समोर आली आहे. यातील एक मोठा देणेकरी अकाली मृत्युमुखी पडल्यामुळे मोठी रक्कम निष्प्रभ झाली. परिणामी कोल्हापूरातील गुंतवणूकदारांचे पैसे अडकले, असेही काहीजणांचे मत आहे. या घटनेमुळे फुलेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट