दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसात होणार आहे.(students)दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. याचसोबत आता परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेतील नियमात बदल झाले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. आता खासगी शाळांवरील शिक्षण अनुदानित शाळेत तर तेथील शिक्षक इतर शाळांमध्ये परीक्षक म्हणून जाणार आहे. बाह्यपरीक्ष नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. (students)यानंतर १० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून होणार आहे. १०वीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या कालावधीत शाळेत बाह्य परीक्षक येणार आहेत. ते प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेणार आहेत.बोर्डाच्या परीक्षेवेळी तर कोणत्याही प्रकराची कॉपी किंवा गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. यासाठी केंद्रा वॉल कंपाउंड, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची सरमिसळ झाल तर परीक्षा केंद्रांवर अनेक ठिकाणी कॉपी झाल्याचे आढळले आहे.(students) त्यामुळे आता पर्यवेक्षकांचीही सरमिसळ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. याचसोबत प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे. तसेच पर्यवेक्षकांचेही कॅमेरे सुरु ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन परीक्षेतील हालचाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळतील.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य