टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका (T20 World Cup) आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय संघाने २० षटकांत ९ गडी गमावत १६१ धावांचा संघर्षपूर्ण डाव उभारला. एकीकडे सातत्याने विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारीने खेळत भारताचा डाव सावरला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

भारताची सुरुवात डळमळीत झाली होती. (T20 World Cup) अवघ्या १२.४ षटकांत ७७ धावांवर भारताचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. त्या क्षणी भारत १०० धावा तरी करेल का, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव क्रीजवर ठाम उभा राहिला. खेळपट्टी मंद असल्याने चेंडू बॅटवर थांबून येत होता आणि मोठे फटके खेळणे कठीण होत होते. अशा परिस्थितीत सूर्यकुमारने संयम राखत खेळी उभी केली आणि योग्य संधी साधत धावसंख्या वाढवत नेली.
सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा करत (T20 World Cup) भारताच्या डावाची लाज राखली. त्याने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नेहमीच्या आक्रमक शैलीच्या तुलनेत त्याने थोडा वेळ घेतला असला, तरी खेळपट्टी आणि परिस्थिती पाहता ही खेळी अत्यंत मोलाची ठरली. अर्धशतकानंतर सूर्यकुमारने गती वाढवत शेवटच्या षटकांत झपाट्याने धावा काढल्या आणि भारताला १६१ धावांपर्यंत पोहोचवले.
या खेळीसह सूर्यकुमार यादवने (T20 World Cup) इतिहासातही आपले नाव नोंदवले आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या खेळाडूंमध्ये नाबाद ८४ धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असून त्याने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या स्थानावर बाबर आझम असून त्याने भारताविरुद्ध नाबाद ६८ धावांची खेळी केली होती.
याशिवाय सूर्यकुमार यादव भारताकडून टी20 वर्ल्डकपमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम केला होता. विराट कोहलीने एकदा, तर रोहित शर्माने चार वेळा हा विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करणारा सूर्यकुमार यादव हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी